शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपासमोर आव्हानांचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 09:24 IST

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशात जबरदस्त कामगिरी करत 80 पैकी 70 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र....

नवी दिल्ली - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानेउत्तर प्रदेशात जबरदस्त कामगिरी करत 80 पैकी 70 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे लोकसभेत भाजपाला स्पष्ट बहुमतही मिळाले होते. मात्र यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत 2014 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. पण खासदारांनी केलेली निराशा, शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न तसेच सपा आणि बसपाने केलेली महाआघाडीची घोषणा यामुळे आगामी निवडणुकीत 2014 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाला आव्हानांचा डोंगर पार करावा लागणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासमोर पुढील आव्हाने असतील.गोवंशाची वाढलेली संख्या - गोहत्याबंदीमुळे उत्तर प्रदेशात गोवंशाची संख्या वारेमाप वाढली आहे. भटकी जनावरे शेतीचे नुकसान करत असून, त्यासाठी शेतकरी मोदी सरकारला दोषी ठरवत आहेत. त्यामुळे योगी सरकारने मोकाट जनावरांसाठी गोशाला बनवण्याची घोषणा केली आहे. मात्र ही समस्या न सुटल्यास मोदी सरकारला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.  खासदारांची अकार्यक्षमता - 2014 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे बहुतांश उमेदवार विजयी झाले होते. मात्र यापैकी बहुतांश खासदारांच्या कामावर त्यांच्या मतदारसंघातील जनता नाराज आहे. काही खासदारांनी निवडणुका आटोपल्यानंतर आपल्या मतदारसंघात तोंड दाखवलेले नाही. त्यामुळे भाजपाला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो.  फसलेली कर्जमाफी - उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळाल्यावर भाजपाने कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र या कर्जामाफीचा पुरेसा फायदा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत.  पक्षांतर्गत गटबाजी आणि मतभेद -  उत्तर प्रदेशमध्ये भाजपामधील काही नेते आणि सहकारी पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर ओमप्रकाश राजभर आणि अनुप्रिया पटेल हे मित्रपक्षांचे नेतेही नाराज आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करताना भाजपाची कसोटी लागणार आहे.  सवर्णांची नाराजी - भाजपाचे पारंपरिक मतदार मानले जाणारे सवर्णही भाजपावर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यामुळे त्यांना सांभाळून घेताना भाजपाची कसोटी लागणार आहे. राममंदिर - उत्तर प्रदेशामध्ये राम मंदिर हा आजही मोठा मुद्दा आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने बहुमतासह सरकार बनवल्यावर आता राम मंदिरासाठी निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र राम मंदिराबाबत नरेंद्र मोदी यांनी थेट भूमिका न घेता कोर्टाच्या निकालानंतर निर्णय घेऊ असे सांगितल्याने रामभक्तांची निराशा झाली आहे.सपा बसपा आघाडी - एकमेकांची प्रतिस्पर्धी असलेले सपा आणि बसपा आगामी लोकसभा निवडणूक एकत्र येऊन लढणार आहेत. या आघाडीमुळे दलित, यादव आणि मुस्लिम यांची एकगठ्ठा मते सपा-बसपाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सपा बसपा आघाडी हे भाजपासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल.  

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी