शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: "आपण एक पाऊल टाका, सरकार चार पाऊल पुढे येईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 14:50 IST

मोदी म्हणाले, कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात ऑनलाइन कार्यक्रम नॉर्मल झाले आहेत. मात्र हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आज आपल्याला कोरोना विषाणूशी लढायचं आहे. मात्र, त्याचसोबत अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचे आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेईल, असेही मोदी यावेळी म्हणाले.

ठळक मुद्देआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योग संघाच्या वार्षिक कार्यक्रमाला संबोधित केले.यावेळी मोदींनी, आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासंदर्भात सरकारचा काय विचार करत आहे, यावर भाष्य केले.मोदी म्हणाले, मला देशाच्या क्षमतेवर, प्रतिभेवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे.

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात देशासमोर आर्थिक पातळीवर अनेक आव्हाने आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाला सुरुवात केली आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योग संघाच्या वार्षिक कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी, "सरकार आपल्या पाठीशी आहोत. आपण केवळ एक पाऊल पुढे या, सरकार चार पाऊल पुढे येईल," असा विश्वास त्यांनी व्यापाऱ्यांना दिला. 

यावेळी मोदींनी, आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासंदर्भात सरकारचा काय विचार करत आहे, यावर भाष्य केले. ते म्हणाले, देशाने आता लॉकडाउन मागे सोडला आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी देशात एकही PPE किट तयार झालेली नव्हती. मात्र, आज दिवसाला तीन लाख किट तयार होत आहेत. आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर सरकारचे लक्ष असेल. एवढेच नाही, तर भारतीय उद्योग संघाने (CII) प्रत्येक सेक्टरसंदर्भात एक रिसर्च तयार करून तो मला द्यावा, असेही मोदी म्हणाले.

CoronaVirus News: भारतात कोरोना टेकतोय गुडघे; ...तर लवकरच वाढणार ठणठणीत होणाऱ्यांचा आकडा!

व्यापाऱ्यांनी पुढे यावे, मी त्यांच्यासोबत -पंतप्रधान मोदींनी व्यापाऱ्यांना विश्वास दिला, की ते त्यांच्यासोबत उभे आहेत. आपण एक पाऊल पुढे आलात, तर सरकार चार पाऊल पुढे येईल. आत्मनिर्भर भारताचा अर्थ रोजगार आणि विश्वास निर्माण करणे, असा आहे. जेनेकरून जागतीक सप्लायमध्ये भारताचा वाटा वाढेल. आता देशात, अशा उत्पादनांची आवश्यकता आहे, जे 'मेड इन इंडियासोबतच, मेड फॉर वर्ल्ड' असेल, असेही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात ऑनलाइन कार्यक्रम नॉर्मल झाले आहेत. मात्र हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आज आपल्याला कोरोना विषाणूशी लढायचं आहे. मात्र, त्याचसोबत अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचे आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेईल, असेही मोदी यावेळी म्हणाले.

George Floyd death: अमेरिकेत 52 वर्षांनंतर सर्वात मोठा हिसाचार; 40 शहरांमध्ये कर्फ्यू

मला देशाच्या क्षमतेवर, प्रतिभेवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे, म्हणूनच विश्वास आहे की, आम्ही पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला वेगवान गती देऊ. कोरोनाने भलेही अर्थव्यवस्थेचा वेग कमी केला असेल परंतु लॉकडाऊन मागे सोडून भारताने अनलॉक 1 च्या टप्प्यात प्रवेश केला आहे, असेही ते म्हणाले.

धक्कादायक दावा! चीन नव्हे, युरोपात होता कोरोनाचा पहिला रुग्ण; नोव्हेंबरमध्ये समोर आली होती पहिली केस

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतbusinessव्यवसायEconomyअर्थव्यवस्था