शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

गल्लीपासून दिल्लीपर्यंत लुटणारा भाजप दूर करा- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 8:24 AM

‘दिल्लीपासून गल्ली’पर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. या लूट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

पिंपरी (पुणे) : इंधनाच्या किमती दररोज वाढत असून, महागाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकरी, कामगारविरोधी धोरण आखणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजपरूपी संकटातून मुक्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे. ‘दिल्लीपासून गल्ली’पर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. या लूट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.रहाटणी काळेवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, केंद्राचे सरकार हे महागाईचे सरकार आहे. कामगार हितविरोधी सरकार आहे. नोकरीची शाश्वती राहिली नाही. जीएसटीचे ३० हजार कोटी केंद्राकडे पडून आहेत. राज्य सरकारला कोणतीही मदत करण्याची भूमिका दिसत नाही. राज्याला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे.’‘केंद्राकडून सत्तेचा गैरवापर होतो हे सांगा’आता सत्ता त्यांच्याकडे आहे म्हणून ते काहीही गोष्टी करू शकतील. मात्र, हे फार काळ चालणार नाही. ते न चालण्याची परिस्थिती जनमानसात निर्माण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. केंद्राकडून सत्तेचा दुरुपयोग कसा होतोय हे घराघरांत सांगण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत व्हायला हवे. भाजपरूपी संकटातून देशाची मुक्तता करायची आहे, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी