शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मागासांच्या जातनिहाय जनगणनेवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी- सुप्रीम कोर्ट;

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 00:49 IST

जनहित याचिकेच्या आधारे काढल्या नोटिसा

नवी दिल्ली : मागासवर्गीयांच्या जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीबाबत आपले म्हणणे सादर करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला सांगितले आहे, न्यायालयाने त्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व सामाजिक न्याय मंत्रालयाला नोटिसा बजावल्या आहेत.

तेलंगणातील मल्लेश यादव व आल्ला रामकृष्ण यांनी मागासवर्गीयांच्या जातनिहाय जनगणनेसाठी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर काही काळ सुनावणी झाली. अशाच प्रकारची एक याचिका आधी दाखल झाली असल्याने दोन्हींवर एकत्रच सुनावणी घेण्यात येईल, असे  सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नंतर स्पष्ट केले. 

मागासवर्गीयांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देण्याची तरतूद आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही असेच आरक्षण आहे, याचा उल्लेख करून, जनगणना न करताच आरक्षणाचे  प्रमाण कसे  ठरविता येईल, असा सवाल याचिकादारांनी केला आहे.  

जातींच्या संख्येत वाढ

मंडल आयोगाने आपल्या अहवालात  देशामध्ये ३७४३ मागास जाती असल्याचा उल्लेख केला होता. सरकारने जातनिहाय जनगणनाच केलेली नाही, मात्र राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात २००६ साली या जातींची संख्या ५६०३ असल्याचे नमूद करण्यात आले आहे,  याचा उल्लेख याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

टॅग्स :IndiaभारतCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार