शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचा सुधारित बोनस!

By admin | Updated: August 31, 2016 06:06 IST

देशातल्या १0 केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी जाहीर केलेला देशव्यापी संप रोखण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी बिगर शेतमजूर अकुशल कामगारांचे किमान वेतन

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली देशातल्या १0 केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी जाहीर केलेला देशव्यापी संप रोखण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी बिगर शेतमजूर अकुशल कामगारांचे किमान वेतन प्रतिदिन ३५0 रुपये करण्याची आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचा सुधारित बोनस देण्याची घोषणा केली. मात्र यामुळे कामगार संघटनांचे समाधान झाले नसून, त्यांनी संप होणारच, अशी भूमिका कायम ठेवली आहे.सुधारित बोनस देण्यामुळे देशाच्या तिजोरीवर १९२0 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे, असे सांगून अर्थमंत्री म्हणाले की, अकुशल कामगारांचे वेतन वाढविणे आवश्यकच होते. त्याबाबतचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. राज्य सरकारांना या संदर्भात केंद्र पत्र पाठवणार आहे. असंघटित क्षेत्रातील अंगणवाडी, माध्यान्न भोजन व आशा प्रकल्पातल्या सेवक-सेविकांना सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळवून देण्याचा प्रस्ताव एका समितीच्या विचाराधीन, असून लवकरच समितीचा अहवाल सरकारला मिळेल. अर्थकारणाला वेग देण्यासाठी मोदी सरकारने अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांना गती देण्याचे ठरवले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देशभर नकारात्मक वातावरण निर्माण होईल, या शक्यतेमुळे पंतप्रधान मोदींनी सोमवारी एक तातडीची बैठक बोलावली होती. तिला जेटली, श्रम व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय व ऊर्जामंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. बैठकीतल्या चर्चेनुसारच अर्थमंत्र्यांनी मंगळवारी सरकारचे निर्णय जाहीर केले.कामगारांचा संपाचा निर्णय मात्र कायमशुक्रवारच्या संपात सिटू, आयटक, इंटकसारख्या १0 केंद्रीय कामगार संघटनांचा समावेश आहे. मात्र भाजपाप्रणीत भारतीय मजदूर संघ त्यात सहभागी नाही. कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणा व कामगार संघटनांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा संप आहे. अर्थमंत्र्यांनी त्यातील काही मागण्या मंजूर केल्या असल्या तरी संपाचा निर्णय मागे घेण्यात आलेला नाही. गेल्या सप्टेंबरात कामगार संघटनांनी किमान वेतन वाढवण्यासह १२ मागण्या सरकारकडे केल्या.इन्शुरन्स, संरक्षणसारख्या क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला त्यांचा विरोध आहे. देशव्यापी संपाविषयी विचारता अर्थमंत्री जेटली सावधपणे इतकेच म्हणाले की, भारतातील कामगार संघटना बऱ्यापैकी जबाबदार असल्यामुळे या विषयावर मला अधिक काही सांगायचे नाही.