शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 18:07 IST

Caste Census: राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष जातिनिहाय जनगणेसाठी गेल्या बऱ्याच दिवसांपासून आग्रही होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत देशातील राजकीय समीकरणं एकदम बदलून टाकली आहेत. त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे फायदे आणि तोटे यांचा घेतलेला हा आढावा.

पहलगाम हल्ल्यावरून देशात तणावाचं वातावरण असतानाच केंद्रातील मोदी सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासह केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणनेसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या राहुल गांधी यांच्या हातून एक मोठा मुद्दा हिसकावून घेतला आहे. राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष जातिनिहाय जनगणेसाठी गेल्या बऱ्याच दिवसांपासून आग्रही होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत देशातील राजकीय समीकरणं एकदम बदलून टाकली आहेत. तसेच या निर्णयाचा परिणाम काही महिन्यांनी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवरही होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे फायदे आणि तोटे यांचा घेतलेला हा आढावा.

जातिनिहाय जनगणना केल्यास समाजात कुठल्या जातीचे किती लोक आहेत. त्यांची आर्थिक, शैक्षणिक स्थिती काय आहे, याची माहिती मिळेल, त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवता येईल, असा दावा केला होता. मागास समाजातील लोकांची संख्या अधिक आहे. मात्र त्यांना तितकासा वाटा मिळत नाही, असा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत होता. राहुल गांधी तर प्रत्येक भाषणामधून आपलं सरकार सत्तेवर आल्यास जातिनिहाय जनगणना करण्याचे आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचे आश्वासन देत होते. मात्र आता मोदींनी त्यांच्या हातून हा मुद्दा हिसकावून घेतला आहे. 

जातिनिहाय जनगणनेचे काय परिणाम होऊ शकतात?जातिनिहाय जनगणना झाल्याने कुठल्या जातीचे किती लोक आहेत, याबाबतची योग्या आकडेवारी समोर येईल. जर मागास जातींमधील लोकांची संख्या अधिक असली तर त्यांना अधिक आरक्षण देण्याबाबत दबाव वाढू शकतो. अद्याप अशा अनेक जाती आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यांनाही याचा फायदा होईल, आतापर्यंत देशात सामाजिक आणि आर्थिक जनगनणा व्हायच्या, मात्र पहिल्यांदाच जातिनिहाय जनगणना होणार आहे.

जातिनिहाय जनगणनेचा सर्वाधिक प्रभाव हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्याला सामाजिक न्यायाच्या राजकारणाची धार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अचानक जातिनिहाय जनगणनेची घोषणा करून मोदी सरकारने या मुद्द्यातील हवा काढून घेतली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना या मुद्द्यावर नव्याने विचार करावा लागू शकतो. तसेच आरक्षणाच्या मर्यादेवरही केंद्रीय पातळीवरून नव्या मांडणीला सुरुवात होऊ शकते.   

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस