शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 18:07 IST

Caste Census: राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष जातिनिहाय जनगणेसाठी गेल्या बऱ्याच दिवसांपासून आग्रही होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत देशातील राजकीय समीकरणं एकदम बदलून टाकली आहेत. त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे फायदे आणि तोटे यांचा घेतलेला हा आढावा.

पहलगाम हल्ल्यावरून देशात तणावाचं वातावरण असतानाच केंद्रातील मोदी सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासह केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणनेसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या राहुल गांधी यांच्या हातून एक मोठा मुद्दा हिसकावून घेतला आहे. राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष जातिनिहाय जनगणेसाठी गेल्या बऱ्याच दिवसांपासून आग्रही होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत देशातील राजकीय समीकरणं एकदम बदलून टाकली आहेत. तसेच या निर्णयाचा परिणाम काही महिन्यांनी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवरही होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे फायदे आणि तोटे यांचा घेतलेला हा आढावा.

जातिनिहाय जनगणना केल्यास समाजात कुठल्या जातीचे किती लोक आहेत. त्यांची आर्थिक, शैक्षणिक स्थिती काय आहे, याची माहिती मिळेल, त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवता येईल, असा दावा केला होता. मागास समाजातील लोकांची संख्या अधिक आहे. मात्र त्यांना तितकासा वाटा मिळत नाही, असा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत होता. राहुल गांधी तर प्रत्येक भाषणामधून आपलं सरकार सत्तेवर आल्यास जातिनिहाय जनगणना करण्याचे आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचे आश्वासन देत होते. मात्र आता मोदींनी त्यांच्या हातून हा मुद्दा हिसकावून घेतला आहे. 

जातिनिहाय जनगणनेचे काय परिणाम होऊ शकतात?जातिनिहाय जनगणना झाल्याने कुठल्या जातीचे किती लोक आहेत, याबाबतची योग्या आकडेवारी समोर येईल. जर मागास जातींमधील लोकांची संख्या अधिक असली तर त्यांना अधिक आरक्षण देण्याबाबत दबाव वाढू शकतो. अद्याप अशा अनेक जाती आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यांनाही याचा फायदा होईल, आतापर्यंत देशात सामाजिक आणि आर्थिक जनगनणा व्हायच्या, मात्र पहिल्यांदाच जातिनिहाय जनगणना होणार आहे.

जातिनिहाय जनगणनेचा सर्वाधिक प्रभाव हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्याला सामाजिक न्यायाच्या राजकारणाची धार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अचानक जातिनिहाय जनगणनेची घोषणा करून मोदी सरकारने या मुद्द्यातील हवा काढून घेतली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना या मुद्द्यावर नव्याने विचार करावा लागू शकतो. तसेच आरक्षणाच्या मर्यादेवरही केंद्रीय पातळीवरून नव्या मांडणीला सुरुवात होऊ शकते.   

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस