शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

CAA : आसाममधील भाजपचे आमदार नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 9:56 AM

Citizen Amendment Act : जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले.

गुवाहाटी: भाजपचे केंद्रीय नेते नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे कितीही जोरदार समर्थन करीत असले तरी आसाममधील भाजपचे काही नेते व आमदार या कायद्यावर नाराज आहेत. जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल जनतेच्या मनात असलेली भीती तसेच संशय दूर करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी भाजपच्या आमदारांनी सोनोवाल यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर भाजपचे आमदार पद्म हजारिका यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

हजारिका म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे आसाममधील भाजप व त्याच्या नेत्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. ते मंत्री कोण यांची नावे सांगण्यास मात्र हजारिका यांनी नकार दिला.

आसामी भाषा, संस्कृती, लोकांची वांशिक ओळख यांचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. या गोष्टी टिकून राहाण्यासाठी आसाम करारातील सहा व सातव्या कलमाची त्वरित अंमलबजावणी करावी असा आग्रह मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केंद्र सरकारकडे धरावा अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे.

तणावपूर्ण शांततानागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या विरोधात आसामसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यात हिंसाचारही झाला. त्यामुळे आसाममधील गुवाहाटीसह दहा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये बुधवारपासून तणावपूर्ण शांतता आहे. या कायद्याविरोधातील आंदोलनाचा ईशान्य भारतातील जोर अजूनही कमी झालेला नाही.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssamआसामBJPभाजपाMLAआमदार