शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

Budget 2022: २०३० चा प्लॅन! देशाच्या विकासासाठी 'इंजिन' महत्त्वाचं; अर्थसंकल्पात रेल्वेसाठी निधी वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 21:01 IST

Railway Budget 2022-23: राष्ट्रीय रेल्वे योजनेत वाहतूक २६-२७ टक्क्यांवरून ४०-४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा रेल्वेच्या अर्थसंकल्पात तरतूद वाढवली जाईल.

नवी दिल्ली – उद्या १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेला पूर्वीपेक्षा जास्त निधी मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात रेल्वे भारताच्या विकासाचं वेगानं वाढणारं एक साधन असल्याचं दिसून येते. रेल्वेचे भविष्य अधिक सुवर्ण करण्यासाठी त्याकडे अधिक लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वेमध्ये निधीची तरतूद वाढवण्याची गरज असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. या निधीची गरज केवळ प्रवाशांच्या मागणीसाठी नाही, तर मालवाहतुकीत रेल्वेचा आदर्श वाटा वाढवण्यास मदत होईल.

राष्ट्रीय रेल्वे योजनेत वाहतूक २६-२७ टक्क्यांवरून ४०-४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा रेल्वेच्या अर्थसंकल्पात तरतूद वाढवली जाईल. आर्थिक सर्वेक्षणातील या गोष्टी लक्षात घेता केंद्र सरकार रेल्वे बजेटमध्ये मोठी वाढ करू शकते. राष्ट्रीय रेल्वे योजना किंवा NRP नुसार, २०३० पर्यंत, रेल्वेने होणारी मालवाहतूक सध्याच्या ४७०० मेट्रिक टनांच्या पातळीवरून ८२०० मेट्रिक टनांपर्यंत वाढेल. पुढील १० वर्षांसाठी रेल्वेच्या भांडवली भांडवलात मोठी वाढ होणार आहे. मागणीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेलाही क्षमता वाढवावी लागेल. २०३० ची कालमर्यादा लक्षात घेऊन हे काम पूर्ण करावे. २०१४ पर्यंत, रेल्वेचे भांडवल वार्षिक ४५,९८० कोटी रुपये होते. त्यावेळी रेल्वे अनेक अकार्यक्षमता आणि गर्दीच्या मार्गांशी लढत होती. त्यामुळे उत्पन्नावरही वाईट परिणाम दिसून आला. २०१४ नंतर रेल्वेकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले आणि कॅपेक्स वाढविण्यात आला. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रेल्वेचे कॅपेक्स बजेट २,१५,००० कोटी रुपये होते, जे २०१४ च्या पातळीपेक्षा ५ पट जास्त होते.( Expected Railway Budget 2022)

आर्थिक वाढीमध्ये रेल्वेची भूमिका

आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, अनेक रेल्वे प्रकल्प सुरू आहेत आणि अनेक प्रकल्प येणाऱ्या काळात प्रस्तावित आहेत, भांडवली निधीसाठी नवीन मार्ग तयार केले गेले आहेत, ज्यामुळे आगामी काळात कॅपेक्समध्ये मोठी वाढ होईल. यामुळे संपूर्ण रेल्वे यंत्रणा देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून उदयास येईल. आगामी काळात देशाच्या आर्थिक प्रगतीत रेल्वेची मोठी भूमिका पाहायला मिळणार आहे.

आर्थिक पाहणीत हवाई प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची चर्चा आहे, तर रेल्वे अजूनही जुन्या काळात परतलेली नाही. सर्वेक्षणानुसार, हवाई प्रवासी वाहतूक कोरोनापूर्वीच्या काळात परतली आहे, परंतु रेल्वे वाहतूक अजूनही खूप मागे आहे. प्रवाशांच्या मासिक आकडेवारीनुसार हे सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की २०२१-२२ मध्ये (डिसेंबरपर्यंत), भारतीय रेल्वेची एकूण मालवाहतूक १,०२९.९४ दशलक्ष टन (MT) होती, जी २०२०-२१ मधील याच कालावधीतील ८७०.०८ वरून १८.३७ टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय रेल्वेने कोविड महामारीपूर्वी (२०१९-२०) वर्षभरात मालवाहतुकीत सुमारे १६ टक्के वाढ नोंदवली, त्याच कालावधीच्या तुलनेत, जेथे मालवाहतूक ८८८.८८ मेट्रिक टन होती.

आर्थिक सर्वेक्षणात काय म्हटले आहे?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण २०२१-२२ सादर केले. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था ९.२ टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. यावरून देशाची अर्थव्यवस्था प्री-कोरोना स्तरावर पोहोचल्याचे दिसून येते आणि हे अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा झाल्याचं सूचित करते. कोविडचा प्रभाव आणि त्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमुळे २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी घसरली. पुढील आर्थिक वर्षात (२०२२-२३) भारतीय अर्थव्यवस्था ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत मांडलेल्या २०२१-२२ च्या आर्थिक सर्वेक्षणात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022railwayरेल्वे