शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Budget 2022: २०३० चा प्लॅन! देशाच्या विकासासाठी 'इंजिन' महत्त्वाचं; अर्थसंकल्पात रेल्वेसाठी निधी वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 21:01 IST

Railway Budget 2022-23: राष्ट्रीय रेल्वे योजनेत वाहतूक २६-२७ टक्क्यांवरून ४०-४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा रेल्वेच्या अर्थसंकल्पात तरतूद वाढवली जाईल.

नवी दिल्ली – उद्या १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेला पूर्वीपेक्षा जास्त निधी मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात रेल्वे भारताच्या विकासाचं वेगानं वाढणारं एक साधन असल्याचं दिसून येते. रेल्वेचे भविष्य अधिक सुवर्ण करण्यासाठी त्याकडे अधिक लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वेमध्ये निधीची तरतूद वाढवण्याची गरज असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. या निधीची गरज केवळ प्रवाशांच्या मागणीसाठी नाही, तर मालवाहतुकीत रेल्वेचा आदर्श वाटा वाढवण्यास मदत होईल.

राष्ट्रीय रेल्वे योजनेत वाहतूक २६-२७ टक्क्यांवरून ४०-४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा रेल्वेच्या अर्थसंकल्पात तरतूद वाढवली जाईल. आर्थिक सर्वेक्षणातील या गोष्टी लक्षात घेता केंद्र सरकार रेल्वे बजेटमध्ये मोठी वाढ करू शकते. राष्ट्रीय रेल्वे योजना किंवा NRP नुसार, २०३० पर्यंत, रेल्वेने होणारी मालवाहतूक सध्याच्या ४७०० मेट्रिक टनांच्या पातळीवरून ८२०० मेट्रिक टनांपर्यंत वाढेल. पुढील १० वर्षांसाठी रेल्वेच्या भांडवली भांडवलात मोठी वाढ होणार आहे. मागणीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेलाही क्षमता वाढवावी लागेल. २०३० ची कालमर्यादा लक्षात घेऊन हे काम पूर्ण करावे. २०१४ पर्यंत, रेल्वेचे भांडवल वार्षिक ४५,९८० कोटी रुपये होते. त्यावेळी रेल्वे अनेक अकार्यक्षमता आणि गर्दीच्या मार्गांशी लढत होती. त्यामुळे उत्पन्नावरही वाईट परिणाम दिसून आला. २०१४ नंतर रेल्वेकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले आणि कॅपेक्स वाढविण्यात आला. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रेल्वेचे कॅपेक्स बजेट २,१५,००० कोटी रुपये होते, जे २०१४ च्या पातळीपेक्षा ५ पट जास्त होते.( Expected Railway Budget 2022)

आर्थिक वाढीमध्ये रेल्वेची भूमिका

आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, अनेक रेल्वे प्रकल्प सुरू आहेत आणि अनेक प्रकल्प येणाऱ्या काळात प्रस्तावित आहेत, भांडवली निधीसाठी नवीन मार्ग तयार केले गेले आहेत, ज्यामुळे आगामी काळात कॅपेक्समध्ये मोठी वाढ होईल. यामुळे संपूर्ण रेल्वे यंत्रणा देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून उदयास येईल. आगामी काळात देशाच्या आर्थिक प्रगतीत रेल्वेची मोठी भूमिका पाहायला मिळणार आहे.

आर्थिक पाहणीत हवाई प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची चर्चा आहे, तर रेल्वे अजूनही जुन्या काळात परतलेली नाही. सर्वेक्षणानुसार, हवाई प्रवासी वाहतूक कोरोनापूर्वीच्या काळात परतली आहे, परंतु रेल्वे वाहतूक अजूनही खूप मागे आहे. प्रवाशांच्या मासिक आकडेवारीनुसार हे सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की २०२१-२२ मध्ये (डिसेंबरपर्यंत), भारतीय रेल्वेची एकूण मालवाहतूक १,०२९.९४ दशलक्ष टन (MT) होती, जी २०२०-२१ मधील याच कालावधीतील ८७०.०८ वरून १८.३७ टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय रेल्वेने कोविड महामारीपूर्वी (२०१९-२०) वर्षभरात मालवाहतुकीत सुमारे १६ टक्के वाढ नोंदवली, त्याच कालावधीच्या तुलनेत, जेथे मालवाहतूक ८८८.८८ मेट्रिक टन होती.

आर्थिक सर्वेक्षणात काय म्हटले आहे?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण २०२१-२२ सादर केले. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था ९.२ टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. यावरून देशाची अर्थव्यवस्था प्री-कोरोना स्तरावर पोहोचल्याचे दिसून येते आणि हे अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा झाल्याचं सूचित करते. कोविडचा प्रभाव आणि त्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमुळे २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी घसरली. पुढील आर्थिक वर्षात (२०२२-२३) भारतीय अर्थव्यवस्था ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत मांडलेल्या २०२१-२२ च्या आर्थिक सर्वेक्षणात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022railwayरेल्वे