शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:42 IST

Purnam Kumar Shaw : बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे अनवधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते. यानंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी पकडलं.

बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे अनवधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते. यानंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी पकडलं. तेव्हापासून त्यांचं कुटुंब खूप चिंतेत होतं. ते पूर्णम यांच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. पाकिस्तानने आता बीएसएफ जवानाची सुटका केल्यावर ते भारतात परत आले आहेत. यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. पूर्णम कुमार यांच्या पत्नी रजनी यांनी "आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. सकाळी मला बीएसएफ मुख्यालयातून फोन आला की पूर्णमजी आले आहेत" असं म्हटलं आहे. 

"२२ दिवसांनी जेव्हा मी त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा सुरुवातीला मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण त्यांची दाढी वाढली होती. पूर्णम यांनी सांगितलं की. काळजी करू नका, मी पूर्णपणे ठीक आहे, माझी मेडिकल टेस्ट देखील झाली आहे. मी जेवल्यानंतर ३ वाजता तुम्हाला फोन करेन. जेव्हा ते घरी येतील तेव्हा मी त्यांना त्यांचे आवडते पदार्थ करून खायला देईन."

"आम्ही आशा सोडून दिली होती"

"मी खूप आनंदी आहे. आम्ही आशा सोडून दिली होती. किती दिवस झाले. युद्धविराम झाला आणि ते तीन दिवसांत परत आलेत. सर्वप्रथम मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानू इच्छिते कारण त्या मला तीन-चार दिवसांपासून सतत फोन करत होत्या. यानंतर मला कल्याण सर आणि अध्यक्ष विजय मिश्रा सर यांचाही फोन आला. सर्वांनी मला खूप पाठिंबा दिला आहे. ममताजींनी माझ्या मेडिकल ट्रीटमेंटबद्दल विचारलं. मी सर्वांचे हात जोडून आभार मानू इच्छिते. मला सांगण्यात आलं होतं की, तुमचे पती येतील तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल. जर मला बोलावलं तर मी नक्कीच जाईन" असं रजनी यांनी म्हटलं आहे. 

ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. "आमचे बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची सुटका झाल्याचं समजल्यावर मला खूप आनंद झाला. मी त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात होते आणि त्यांच्या पत्नीशी तीन वेळा बोलले. आजही मी त्यांना फोन केला. माझ्या भावासारख्या असलेल्या देशाच्या जवानाला, त्यांच्या पत्नी रजनी शॉला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा" असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

पूर्णम कुमार यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वत्र मिठाई वाटली जात आहे. माध्यमांशी संवाद साधताना कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं की, "आज आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि बीएसएफ अधिकाऱ्यांचे आभार मानतो. गेले २ आठवडे आमची रात्रीची झोप उडाली होती. आम्हाला त्यांच्या तब्येतीबद्दल सतत काळजी वाटत होती. आता आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि त्यांना  भेटण्यासाठी उत्सुक आहोत. अखेर आमची प्रार्थना फळाला आली आहेत." 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतIndian Armyभारतीय जवान