शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:42 IST

Purnam Kumar Shaw : बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे अनवधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते. यानंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी पकडलं.

बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे अनवधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते. यानंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी पकडलं. तेव्हापासून त्यांचं कुटुंब खूप चिंतेत होतं. ते पूर्णम यांच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. पाकिस्तानने आता बीएसएफ जवानाची सुटका केल्यावर ते भारतात परत आले आहेत. यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. पूर्णम कुमार यांच्या पत्नी रजनी यांनी "आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. सकाळी मला बीएसएफ मुख्यालयातून फोन आला की पूर्णमजी आले आहेत" असं म्हटलं आहे. 

"२२ दिवसांनी जेव्हा मी त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा सुरुवातीला मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण त्यांची दाढी वाढली होती. पूर्णम यांनी सांगितलं की. काळजी करू नका, मी पूर्णपणे ठीक आहे, माझी मेडिकल टेस्ट देखील झाली आहे. मी जेवल्यानंतर ३ वाजता तुम्हाला फोन करेन. जेव्हा ते घरी येतील तेव्हा मी त्यांना त्यांचे आवडते पदार्थ करून खायला देईन."

"आम्ही आशा सोडून दिली होती"

"मी खूप आनंदी आहे. आम्ही आशा सोडून दिली होती. किती दिवस झाले. युद्धविराम झाला आणि ते तीन दिवसांत परत आलेत. सर्वप्रथम मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानू इच्छिते कारण त्या मला तीन-चार दिवसांपासून सतत फोन करत होत्या. यानंतर मला कल्याण सर आणि अध्यक्ष विजय मिश्रा सर यांचाही फोन आला. सर्वांनी मला खूप पाठिंबा दिला आहे. ममताजींनी माझ्या मेडिकल ट्रीटमेंटबद्दल विचारलं. मी सर्वांचे हात जोडून आभार मानू इच्छिते. मला सांगण्यात आलं होतं की, तुमचे पती येतील तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल. जर मला बोलावलं तर मी नक्कीच जाईन" असं रजनी यांनी म्हटलं आहे. 

ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. "आमचे बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची सुटका झाल्याचं समजल्यावर मला खूप आनंद झाला. मी त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात होते आणि त्यांच्या पत्नीशी तीन वेळा बोलले. आजही मी त्यांना फोन केला. माझ्या भावासारख्या असलेल्या देशाच्या जवानाला, त्यांच्या पत्नी रजनी शॉला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा" असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

पूर्णम कुमार यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वत्र मिठाई वाटली जात आहे. माध्यमांशी संवाद साधताना कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं की, "आज आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि बीएसएफ अधिकाऱ्यांचे आभार मानतो. गेले २ आठवडे आमची रात्रीची झोप उडाली होती. आम्हाला त्यांच्या तब्येतीबद्दल सतत काळजी वाटत होती. आता आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि त्यांना  भेटण्यासाठी उत्सुक आहोत. अखेर आमची प्रार्थना फळाला आली आहेत." 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतIndian Armyभारतीय जवान