शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पंजाबमध्ये त्रिकोणी लढतीत मतविभाजन ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 3:34 AM

‘हाता’ची पकड मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न : अकाली दल, आपला फुटीची डोकेदुखी

मनीषा मिठबावकर चंदीगढ : पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांपैकी गुरुदासपूर, भटिंडा या जागा महत्त्वाच्या मानल्या जातात. हेच महत्त्व लक्षात घेत भाजपने अभिनेता सनी देओलला गुरुदासपूरमधून उमेदवारी दिली. तर भटिंडामधून भाजपचा मित्रपक्ष अकाली दलाकडून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर उभ्या आहेत. दुसरीकडे प्रतिष्ठेच्या या दोन्ही जागांवर ‘हात’ची पकड मजबूत करण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसने येथे प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.

या दोन्ही तुल्यबळ पक्षांना गेल्या वेळेप्रमाणेच तगडे आव्हान देण्यासाठी आपचीही मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, आप, अकाली दलाला लागलेल्या फुटीच्या ग्रहणामुळे विभागल्या जाणाऱ्या मतांची डोकेदुखी या दोन्ही पक्षांना आहे. शिरोमणी अकाली दल हा येथील मोठा प्रादेशिक पक्ष. गेली अनेक वर्षे येथे अकाली दल-भाजप, काँग्रेसमध्ये थेट लढत रंगत असल्याचे पाहायला मिळत होते; परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपने येथील राजकारणात उडी घेत त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. मात्र आता आप, अकाली दलातील फुटीर नेत्यांनी वेगळे पक्ष काढत तिसरी आघाडी उभी केली आहे. त्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या जागाही ठरणार निर्णायकपंजाब लोकसभा मतदारसंघातील अमृतसर हादेखील प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सुमारे दोन दशकांहून अधिक काळ येथे भाजपची मजबूत पकड होती. २००४ ते २०१४पर्यंत येथे नवज्योतसिंग सिद्धू भाजपचे खासदार होते. मात्र, पक्षातील मतभेदानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यंदा या जागेवर काँग्रसकडून गुरजीत सिंह अलूजा, भाजचे हरदीप सिंह पुरी तर आपकडून कुलदीप सिंह धालीवाल रिंगणात आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथे आपचे डॉ. धर्मवारी गांधी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या प्रणीत कौर यांना मोठ्या फरकाने हरवले होते. त्यापूर्वी या मतदारसंघात सर्वाधिक प्रभाव हा काँग्रेसचा होता. आता आपशी फारकत घेत डॉ. गांधी पीडीएत सहभागी झाल्यामुळे काँगे्रसला ही जागा परत मिळवण्याची संधी आहे.

या मतदारसंघावर अकाली दलाचे वर्चस्व पाहायला मिळते. २००९, २०१४ अशाप्रकारे सलग दोनदा येथे अकाली दलाचे शेरसिंग घुबाया निवडून आले होते. त्यानंतर पक्षातील मतभेदामुळे आता घुबाया काँग्रेसकडून या जागेवर उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल लढणार आहेत. १९८५ नंतर एकदाही या जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही.

१९ मे रोजी मतदान जागा - (१३) अमृतसर, आनंदपूर साहेब, खडूर साहेब, गुरुदासपूर, जालंधर, पतियाला, फतेहगड, फरीदकोट, फिरोजपूर, भटिंडा, लुधियाना, संगरूर, होशियारपूर.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसAAPआप