शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:45 IST

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. जनभावनेचा उल्लेख करत केजरीवालांनी नितीश कुमार यांना भाजपची साथ सोडण्याचा मेसेज अप्रत्यक्षपणे दिला आहे. 

Arvind Kejriwal letter to Nitish Kumar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाने विरोधकांना भाजपला घेरण्यासाठी मुद्दा मिळाला असून, देशभरात त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. या विधानावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींना लक्ष्य केल्यानंतर आपचे नेते केजरीवाल यांनी थेट एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. भाजपची साथ सोडण्याचा मेसेज नितीश कुमारांना पत्रातून दिला आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी नितीश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, " मी तुम्हाला हे पत्र अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात लिहित आहे. तो केवळ संविधानाचाच नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाशीही संबंधित आहे."

"देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाने संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे. त्यांचं असं म्हणणं की, 'आंबेडकर... आंबेडकर बोलणं आजकाल फॅशन झाली आहे.' हा फक्त अवमानजनक नाही, तर भाजपचा बाबासाहेब आणि संविधानाकडे बघण्याचा दृष्टीकोणही उघड करते", केजरीवालांनी पत्रात म्हटले आहे. 

भाजपने असं म्हणण्याचं धाडस कसं केलं?

नितीश कुमारांना लिहिलेल्या पत्रात केजरीवालांनी पुढे म्हटलं आहे की, "बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉज् ने सन्मानित केले होते. ज्यांनी भारताच्या संविधान लिहिले आणि समाजातील सर्वात वंचित घटकांना अधिकार मिळवून देण्याचे स्वप्न बघितले, त्यांच्याबद्दल असं म्हणण्याचं धाडस भाजपने कसं केलं?"

"यामुळे देशभरात कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे विधान केल्यानंतर अमित शाह यांनी माफी मागण्याऐवजी त्यांचे विधान योग्य ठरवले आहे. पंतप्रधानांनी जाहीरपणे अमित शाह यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्याने जखमेवर मीठ लावण्याचेच काम केले आहे. लोकांना वाटू लागलं आहे की, बाबासाहेबांच्या अनुयायांनी आता भाजपचे समर्थन करू शकत नाही", असे म्हणत अरविंद केजरीवालांनी अप्रत्यक्षपणे भाजपची साथ सोडण्याचा मेसेज नितीश कुमारांना दिला आहे. 

सखोल विचार करा -अरविंद केजरीवाल

पत्राच्या अखेरीस अरविंद केजरीवालांनी म्हटले आहे की, "बाबासाहेब फक्त एक नेता नाहीत, तर आपल्या देशाचा आत्मा आहेत. भाजपच्या या विधानानंतर लोकांना असं वाटतं आहे की, तुम्ही या मुद्द्यावर सखोल विचार करावा."

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी