शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:45 IST

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. जनभावनेचा उल्लेख करत केजरीवालांनी नितीश कुमार यांना भाजपची साथ सोडण्याचा मेसेज अप्रत्यक्षपणे दिला आहे. 

Arvind Kejriwal letter to Nitish Kumar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाने विरोधकांना भाजपला घेरण्यासाठी मुद्दा मिळाला असून, देशभरात त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. या विधानावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींना लक्ष्य केल्यानंतर आपचे नेते केजरीवाल यांनी थेट एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. भाजपची साथ सोडण्याचा मेसेज नितीश कुमारांना पत्रातून दिला आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी नितीश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, " मी तुम्हाला हे पत्र अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात लिहित आहे. तो केवळ संविधानाचाच नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाशीही संबंधित आहे."

"देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाने संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे. त्यांचं असं म्हणणं की, 'आंबेडकर... आंबेडकर बोलणं आजकाल फॅशन झाली आहे.' हा फक्त अवमानजनक नाही, तर भाजपचा बाबासाहेब आणि संविधानाकडे बघण्याचा दृष्टीकोणही उघड करते", केजरीवालांनी पत्रात म्हटले आहे. 

भाजपने असं म्हणण्याचं धाडस कसं केलं?

नितीश कुमारांना लिहिलेल्या पत्रात केजरीवालांनी पुढे म्हटलं आहे की, "बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉज् ने सन्मानित केले होते. ज्यांनी भारताच्या संविधान लिहिले आणि समाजातील सर्वात वंचित घटकांना अधिकार मिळवून देण्याचे स्वप्न बघितले, त्यांच्याबद्दल असं म्हणण्याचं धाडस भाजपने कसं केलं?"

"यामुळे देशभरात कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे विधान केल्यानंतर अमित शाह यांनी माफी मागण्याऐवजी त्यांचे विधान योग्य ठरवले आहे. पंतप्रधानांनी जाहीरपणे अमित शाह यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्याने जखमेवर मीठ लावण्याचेच काम केले आहे. लोकांना वाटू लागलं आहे की, बाबासाहेबांच्या अनुयायांनी आता भाजपचे समर्थन करू शकत नाही", असे म्हणत अरविंद केजरीवालांनी अप्रत्यक्षपणे भाजपची साथ सोडण्याचा मेसेज नितीश कुमारांना दिला आहे. 

सखोल विचार करा -अरविंद केजरीवाल

पत्राच्या अखेरीस अरविंद केजरीवालांनी म्हटले आहे की, "बाबासाहेब फक्त एक नेता नाहीत, तर आपल्या देशाचा आत्मा आहेत. भाजपच्या या विधानानंतर लोकांना असं वाटतं आहे की, तुम्ही या मुद्द्यावर सखोल विचार करावा."

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी