शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
2
वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
3
Dollar Vs Rupee: अरे बाप रे... १ डॉलर = ₹ ९०.१३ ! भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण; तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
4
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
5
६० व्या वर्षी ₹५००० चं पक्कं पेन्शन, पात्रतेसोबत जाणून घ्या अर्ज करायची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
6
तामिळनाडूत शाळा बंद, जम्मू काश्मीरसह MP, UP मध्येही शाळांना दिर्घ काळ सुट्टी घोषित, कारण काय?
7
भयंकर! पळून लग्न केलं, ९ महिन्यांत IAS अधिकाऱ्याच्या लेकीने आयुष्य संपवलं, हुंड्यासाठी छळ
8
प्रभाग पुनर्रचनेला आव्हान, सुनावणीला सुरुवात; मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी काय सांगितलं? 
9
अमिताभ, शाहरुख आणि हृतिक 'अ‍ॅक्टिंग'शिवाय कमावतायेत कोट्यवधी; 'या' क्षेत्रात कलाकारांची मोठी गुंतवणूक
10
पानाच्या टपरीवर अवघ्या ४० रुपयांवरून वाद चिघळला; भर लग्नाच्या मंडपात शिरून दोघांनी हंगामा केला! 
11
घरवापसी! एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत परतले
12
विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय; तब्बल १६ वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये घडणार असा प्रकार
13
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
14
इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई
15
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
16
तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
17
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये प्रशिक्षणादरम्यान इंदिरा गांधी कालव्यात लष्कराचा टँक बुडाला; एका जवानाचा मृत्यू
18
सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
19
नौदलाच्या आक्रमणामुळे पाकिस्तानने टाकली नांगी; व्हाईस ॲडमिरल स्वामिनाथन यांचे विधान
20
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video - "गांधी कुटुंबातील लोक जोपर्यंत पक्षामध्ये असतील तोपर्यंत काँग्रेस पाताळात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 16:59 IST

राजस्थानमधील ही परिस्थिती राहुल गांधी यांच्यामुळेच उद्भवली आहे. राहुल आणि प्रियंका गांधी हे काँग्रेसचा नाश होण्यामागचं कारण आहेत. गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर काँग्रेस पाताळात जाईल अशी जोरदार टीका उमा भारती यांनी केली.

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. राजस्थानमधील सत्तासंघर्षावर भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला आहे.  

राजस्थानमधील ही परिस्थिती राहुल गांधी यांच्यामुळेच उद्भवली आहे. राहुल आणि प्रियंका गांधी हे काँग्रेसचा नाश होण्यामागचं कारण आहेत. गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर काँग्रेस पाताळात जाईल अशी जोरदार टीका उमा भारती यांनी केली आहे. तसेच तरूणांना अपमानित करतात. ते स्वत: काम आणि मेहनत करू इच्छित नाहीत असं देखील उमा यांनी म्हटलं आहे. "राजस्थानमध्ये सध्या निर्माण झालेलं संकट हे राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळेच निर्माण झालं आहे. ते तरूणांना अपमानित करतात. स्वत: काम आणि मेहनत करू इच्छित नाहीत" असं म्हणत उमा भारती यांनी गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. 

"तरूण आणि बुद्धीवान नेत्यांना त्यांनी एवढा अपमान केला की तो त्यांना सहन झाला नाही. त्यांच्या समोर दुसरा कोणताही मार्ग नव्हता. सचिन पायलट हे राजेश पायलट यांचे सुपुत्र आहेत. राजेश पायलट हे माझ्या भावासारखे होते. आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि सचिन पायलट हे स्वाभिमानी व्यक्ती आहेत हे मला माहीत आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोपर्यंत काँग्रेस पाताळात जाईल" असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. 

राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार आहेत असा आरोप उमा भारती यांनी सोमवारी केला होता. तसेच मध्य प्रदेशामधील परिस्थितीलाही तेच जबाबदार होते असं देखील म्हटलं होतं. "काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना राहुल गांधी मोठं होऊ देत नाहीत. ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत होती. आता सचिन पायलट यांची परिस्थितीही काही फारशी वेगळी नाही" उमा भारती यांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आज परत एकदा राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बापरे! कोरोनाग्रस्ताला आली पान मसाल्याची तलफ, रुग्णालयातून काढला पळ अन्...

CoronaVirus News : कोरोना वॉरियर महिला अधिकाऱ्याचा मृत्यू; कर्तव्यनिष्ठेला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम

CBSE Results 2020 : मोठी बातमी! CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर 

चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर

बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या, प्रियंका गांधींनी केली मोदींना विनंती?, जाणून घ्या सत्य

CoronaVirus News : सलाम! ...अन् डॉक्टरने स्वत: ट्रॅक्टर चालवून अंत्यसंस्कारासाठी नेला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह

Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थानPoliticsराजकारणUma Bhartiउमा भारतीBJPभाजपा