शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

Coronavirus : 'भाजपा जातीय पूर्वग्रह आणि द्वेषाचा व्हायरस पसरवतोय', सोनिया गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 14:07 IST

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची गुरुवारी एक बैठक झाली असून यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली - कोरोनामुळे जगातील अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोनाचा धोका वाढत असून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 21,393 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 681 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची गुरुवारी (23 एप्रिल) एक बैठक झाली असून यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपावर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.

सोनिया गांधी यांनी कोरोनाशी लढत असताना भाजपाकडून जातीय पूर्वग्रह आणि द्वेषाचा व्हायरस पसरवला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच याबाबत चिंता करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 'मला तुमच्यासोबत असं काही शेअर करायचं आहे ज्याची प्रत्येक भारतीयाने चिंता करण्याची गरज आहे. जेव्हा आपण सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाशी लढा देणं अपेक्षित असताना भाजपा मात्र जातीय पूर्वग्रह आणि द्वेष पसरवत आहे' असं त्यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. सोनिया गांधी यांनी लॉकडाऊनमध्ये 12 कोटी लोकांनी रोजगार गमावले आहेत. गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने त्वरित 7500 रूपये देण्याची मागणी केली. तसेच कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय अनेक वैद्यकीय कर्मचारी कोरोनाचा सामना करत आहेत. त्यामुळे या सर्व कोरोना वॉरिअर्सना सलाम केला पाहिजे असं देखील सोनिया गांधी यांनी बैठकीत म्हटलं आहे.

'लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 12 कोटी लोकांनी आपला रोजगार गमावला आहेत. येणाऱ्या काही दिवसांत बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला किमान 7500 रूपयांची आर्थिक मदत देणे आवश्यक आहे' असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकारवर निशाणाही साधला. पीपीई किट्सची कमतरता आणि त्यांच्या गुणवत्तेबाबत सवाल उपस्थित केला आहे. पीपीई किट्सची गुणवत्ता योग्य नाही. आम्ही अनेक सूचना केल्या. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्या त्वरित सोडवल्या पाहिजेत. खरीपाच्या पिकांसाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत. प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम शेतकरी खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : ...म्हणून विद्यार्थ्यांसाठी रोज झाडावर चढतो 'हा' शिक्षक

Coronavirus : 100 गाड्यांचा ताफा अन् बरंच काही... अमेरिकेत भारतीय डॉक्टरचा अनोखा सन्मान, Video पाहून वाटेल अभिमान

Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण

Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसIndiaभारतDeathमृत्यूBJPभाजपा