शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आणीबाणी लागू करणाऱ्यांनी लोकशाहीच्या बाता मारु नयेत- शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 5:14 PM

काँग्रेस-जेडीएसच्या युतीवर अमित शहांचं शरसंधान

नवी दिल्ली: कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. त्यांचे निम्म्याहून अधिक मंत्री पराभूत झाले. याच पराभवाचं काँग्रेसकडून सध्या सेलिब्रेशन सुरू आहे, असा टोला भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी काँग्रेसला हाणला आहे. कर्नाटकमधील भाजपाचं सरकार अवघ्या 55 तासांमध्ये कोसळल्यानंतर शहा यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आणीबाणीवरुन काँग्रेसवर शरसंधान साधलं. आणीबाणी लागू करणाऱ्यांनी लोकशाहीच्या बाता मारु नयेत, अशा तिखट शब्दांमध्ये शहा यांनी काँग्रेसवर टीका केली. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक 104 जागा मिळाल्या. शनिवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं भाजपाला दिले होते. मात्र बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा नसल्यानं येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता कर्नाटकमध्ये राज्यपालांनी काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलंय. काँग्रेस आणि जेडीएसच्या या निवडणुकीनंतरच्या युतीवर अमित शहांनी जोरदार टीका केली. काँग्रेस आणि जेडीएसची युती जनमताविरुद्ध असल्याचं शहा म्हणाले. 

ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाचा उल्लेख करुनही शहांनी काँग्रेसला टोला लगावला. 'आता काँग्रेसला ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाबद्दल विश्वास वाटू लागला आहे. अर्धवट विजय मिळूनही काँग्रेसला ईव्हीएम आणि निवडणूक आयोग आवडू लागला आहे, हे खूप चांगलं आहे,' असा चिमटा शहांनी काढला. विरोधकांच्या एकतेवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. अखिलेश यादव, ममता बॅनर्जी 2014 मध्येही आमच्या विरोधात होते. 2019 मध्ये असतील. 2019 मध्ये आम्ही 2014 पेक्षा मोठा विजय मिळवू, असं शहा यांनी म्हटलं. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८