शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

'पंतप्रधान मोदी आणि जेटलींना अर्थशास्त्र कळत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 11:03 AM

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही, कारण भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे ते सांगतात; पण वास्तवात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आहे,' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देभाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही'कोलकातामध्ये 'एंगेजिंग पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' या विषयावर स्वामी यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी बोलत असताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

कोलकाता - भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही, कारण भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे ते सांगतात; पण वास्तवात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आहे,' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. शनिवारी (23 मार्च ) कोलकातामध्ये 'एंगेजिंग पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' या विषयावर स्वामी यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी बोलत असताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी 'पंतप्रधान मोदी असं का सांगतात, हे मला कळत नाही. जीडीपीनुसार, अमेरिका आणि चीननंतर भारताची अर्थव्यवस्था सर्वात मोठी आहे' असं म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही निशाणा साधला. विनिमय दरांमध्ये सतत बदल होत असतात आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने जीडीपी गणनेच्या वैज्ञानिक पद्धतीच्या स्वीकारार्ह प्रक्रियेनुसार भारताची अर्थव्यवस्था ही सध्या सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. क्रयशक्ती क्षमता ही अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या गणनेची योग्य पद्धत आहे आणि त्याआधारे भारत सध्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे, असं ही स्वामी यांनी सांगितलं आहे. 

मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही- सुब्रमण्यम स्वामीमोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची समज नाही, अशा शब्दात काही महिन्यांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. 'द क्विंट'ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी यासंदर्भात भाष्य केले होते. मुलाखतीच्या सुरुवातीला भाजपा मंत्र्यांवर टीका करणाऱ्या स्वामींना आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील केला होता. हे करताना त्यांनी विरोधी पक्षांवरही टीका केली. अर्थव्यवस्थेतील गुंतागुंत समजून घेणारा एकही नेता विरोधी पक्षात नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

स्वामी यांनी पंतप्रधान मोदींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. केवळ अर्थव्यवस्थेच्या कामगिरीवरून तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही, असे स्वामींनी सांगितले होते. मोदी सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की अर्थव्यवस्थेतील कामगिरीवरुन कधीच निवडणुका जिंकता येत नाही. हे वाजपेयींनाही जमले नाही की नरसिंह राव किंवा मोरारजी देसाईंना. देशाच्या समस्या मोदी जाणतात. पण त्यांनी चुकीचे मित्र निवडलेत. आता उर्वरित वर्षांत ते वेगाने पुढे जातील आणि चांगली कामगिरी करतील. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा चांगली कामगिरी करेल असा विश्वास स्वामींनी व्यक्त केला होता. भाजपाला लोकसभा निवडणुकीत 300 च्या आसपास जागा मिळतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले होते.

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटलीEconomyअर्थव्यवस्था