शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

छत्तीसगडमध्ये भाजपाच्या नेत्यांना नडला अतिआत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:38 IST

आपलाच विजय होणार हा अतिआत्मविश्वास सत्ताधारी भाजपाला नडला व त्यांच्या विकासाचा नारा हा आतून पोकळ असल्याचा कौलच जनतेने दिला आहे.

- योगेश पांडेहिंदीत एक म्हण प्रसिद्ध आहे, ‘जो खुदको किताब कहते थे वो बिखरे हुए पन्ने निकले’. छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये अगदी असेच चित्र दिसून आले. आपलाच विजय होणार हा अतिआत्मविश्वास सत्ताधारी भाजपाला नडला व त्यांच्या विकासाचा नारा हा आतून पोकळ असल्याचा कौलच जनतेने दिला आहे. छत्तीसगडमध्ये १५ वर्षांनंतर ‘कमबॅक’ करणाऱ्या काँग्रेसच्या विजयात सर्वात मोलाचा वाटा उचलला तो राहुल गांधी व त्यांच्या टीमने.एकीकडे भाजपाचा विकासाचा नारा सुरू असताना काँग्रेसने मात्र तळागाळात जाऊन प्रचार करण्यावर जास्त भर दिला व त्याचेच फळ या निकालांमध्ये दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल, पक्ष प्रभारी पी.एल.पुनिया, माजी प्रदेशाध्यक्ष चरणदास महंत, विरोधी पक्षनेते टी. एस. सिंहदेव, माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम व ‘एआयसीसी’च्या ओबीसी सेलचे प्रमुख ताम्रध्वज साहू यांच्या सामूहिक प्रयत्नांतून काँग्रेसला यशोशिखर गाठता आले.भ्रष्टाचार, कर्जबाजारी शेतकरी, राज्यातील गरिबी, नक्षलग्रस्तांच्या समस्या, बेरोजगारी या मुद्यांवर कॉंग्रेसने जास्त भर दिला. ‘गढबो नवा छत्तीसगड’ हा काँग्रेसचा नारा पक्षाला नवी उर्जा देणारा ठरला. या निकालांनी छत्तीसगड कॉंग्रेसला २०१९ साठी हुरूप दिला आहे हे निश्चित.निकालाची कारणे...१५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारविरोधात जनतेची नाराजी. मंत्री, आमदारांची अकार्यक्षमता.निवडणुकांसाठी काँग्रेसचे प्रभावी व्यवस्थापन. तळागाळात जाऊन नेमक्या समस्यांवर ठेवले बोट.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यात १७ सभा घेऊन वातावरण निर्मितीसाठी पुढाकार घेतला.

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election Resultछत्तीसगड विधानसभा निवडणूक निकालChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेस