शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

महाराष्ट्रातील आघाडी सरकार तर 'सडलेले फळ', ठाकरे सरकार पडायलाच हवे - उमा भारती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 21:24 IST

उमा भारती म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेस युतीचे सरकार खरे तर सडलेले फळ होते, जे आता तुटले आहे.

शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, महाराष्ट्राचे राजकारणात जबरदस्त ढवळून निघाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे सरकार पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. यातच, भाजपच्या ज्येष्ठ आणि फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, हे सरकार पडायलाच हवे,' असे उमा भारती यांनी म्हटले आहे. 

यावेळी उमा भारती यांनी शिवसेनेवर जबरदस्त हल्ला चढवला. उमा भारती म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेस युतीचे सरकार खरे तर सडलेले फळ होते, जे आता तुटले आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार अव्यवहार्य होते. कारण काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होऊच शकत नाही. ते एक सडलेले फळ होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे. एवढा एकच त्यांचा हेतू होता. 

उमा भारती म्हणाल्या, 'ही बाळासाहेबांची शिवसेना बिल्कुल नव्हती, ही तर काँग्रेसची B टीम असलेली शिवसेना होती. हे सरकार नक्कीच पडायला हवे. कारण हे सरकार हिंदू विरोधी आणि महिला विरोधी सरकार आहे.' एवढेच नाही, तर उद्धव ठाकरेंवर निशाना साधत, या शिवसेनेने आपले नाव बदलून 'काँग्रेस सेना' ठेवायला हवे, असेही भारती यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस