शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
2
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
3
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
4
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
5
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
6
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
7
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
8
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
9
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
10
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
11
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
12
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
13
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
14
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
15
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
16
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
17
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
18
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
19
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
20
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील आघाडी सरकार तर 'सडलेले फळ', ठाकरे सरकार पडायलाच हवे - उमा भारती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 21:24 IST

उमा भारती म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेस युतीचे सरकार खरे तर सडलेले फळ होते, जे आता तुटले आहे.

शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, महाराष्ट्राचे राजकारणात जबरदस्त ढवळून निघाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे सरकार पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. यातच, भाजपच्या ज्येष्ठ आणि फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, हे सरकार पडायलाच हवे,' असे उमा भारती यांनी म्हटले आहे. 

यावेळी उमा भारती यांनी शिवसेनेवर जबरदस्त हल्ला चढवला. उमा भारती म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेस युतीचे सरकार खरे तर सडलेले फळ होते, जे आता तुटले आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार अव्यवहार्य होते. कारण काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होऊच शकत नाही. ते एक सडलेले फळ होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे. एवढा एकच त्यांचा हेतू होता. 

उमा भारती म्हणाल्या, 'ही बाळासाहेबांची शिवसेना बिल्कुल नव्हती, ही तर काँग्रेसची B टीम असलेली शिवसेना होती. हे सरकार नक्कीच पडायला हवे. कारण हे सरकार हिंदू विरोधी आणि महिला विरोधी सरकार आहे.' एवढेच नाही, तर उद्धव ठाकरेंवर निशाना साधत, या शिवसेनेने आपले नाव बदलून 'काँग्रेस सेना' ठेवायला हवे, असेही भारती यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस