शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

उमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 18:36 IST

बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात 30 सप्टेंबरला सीबीआयचे विशेष न्यायालय निकाल देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

ठळक मुद्देआज ऋषिकेश येथील AIIMS मध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी ट्विट करत याचे तीन कारण सांगितले आहेत. बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात 30 सप्टेंबरला सीबीआयचे विशेष न्यायालय निकाल देणार आहे.

नवी दिल्ली:भाजपा नेत्या तसेच माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर त्या आज ऋषिकेश येथील AIIMS मध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी ट्विट करत याचे तीन कारण सांगितले आहेत. यांपैकी एकात, त्यांनी बाबरी मशीदप्रकरणी येणाऱ्या निकालासंदर्भात भाष्य केले आहे. 

बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात 30 सप्टेंबरला सीबीआयचे विशेष न्यायालय निकाल देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

ShriKrishna JanamBhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी 30 तारखेला सुनावणी, शाही ईदगाह हटविण्याची मागणी

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 जण आरोपी आहेत.

यासंदर्भात उमा भारती यांनी ट्विट करत म्हटले आहे, ''मी अत्ताच एम्स ऋषिकेशमध्ये भरती झाले आहे. याची तीन कारणे आहेत. (1) हर्षवर्धन जी प्रचंड चिंता करत होते. (2) माझा ताप रात्री वाढला. (3) एम्समध्ये माझी तपासणी झाल्यानंतर सकारात्मक अहवाल आला, तर परवा लखनौ येथील सीबीआय न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे.''

जयंती विशेष: मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर गेले भगत सिंग; कुणी दिलं होतं त्यांना हे नाव?

यापूर्वी उमा भारती यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विट केले होते, हिमायल यात्रा संपण्याच्या शेवटच्या दिवशी, मी प्रशासनाला आग्रह करून कोरोना टेस्टच्या टीमला बोलविले. कारण, मला ३ दिवस हलका ताप होता, असे उमा भारती यांनी ट्विट करत म्हटले होते. कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वत:च सांगितले.

SBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट

हिमालयात कोविड-19 चे सर्व नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. तरीही कोरोनाची लागण झाली. सध्या वंदे मातरम् कुंज याठिकाणी क्वारंटाइन आहे. येथे कुटुंबीयांसारखे आहे. 4 दिवसांनी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करेन आणि त्यानंतर डॉक्टरांचा सल्ल्याने निर्णय घेईन, असेही उमा भारती यांनी म्हटले होते. याचबरोबर, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करावी, असे आवाहनही त्यांनी ट्विट करून केले होते.

आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशAIIMS hospitalएम्स रुग्णालय