शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

दक्षिणेत पंतप्रधान मोदींची लाट का नाही?; जेपी नड्डा यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 10:40 IST

दक्षिण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जादू का चालत नाही, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारण्यात आला.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ दक्षिणेत अडलाय?भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले स्पष्ट दक्षिण भारतात भाजपची कामगिरी सुधारली - जेपी नड्डा

चेन्नई: आताच्या घडीला देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. त्या त्या ठिकाणचे पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) आपापली ताकद पणाला लावत आहे. भाजपने विजयरथाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जादू का चालत नाही, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारण्यात आला. यावर, आता ही परिस्थिती राहिलेली नाही. दक्षिण भारतातील राज्यांमध्येही भाजप चांगली कामगिरी करत आहे, असे जेपी नड्डा यांनी सांगितले. (bjp leader jp nadda answers on why pm narendra modi magic not working in south india)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जेपी नड्डा यांना भाजपचा विजयरथ हा दक्षिण भारतात अडला आहे, या प्रश्नावर उत्तर देताना जेपी नड्डा म्हणाले की, पूर्वी असे घडत होते. मात्र, आताची परिस्थिती तशी नाही. दक्षिण भारतातील राज्यांतही भाजप चांगली कामगिरी करत आहे. तेलंगण येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. हैदराबाद नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे, असे जेपी नड्डा यांनी नमूद केले.

२ वर्षांत ५ हजारांहून अधिक डिलिव्हरी, उत्कृष्ट रेटिंग; Zomato ने घेतली 'त्या'चीच बाजू

पुदुच्चेरीत भाजपचे सरकार येईल

आगामी कालावधीत होऊ घातलेल्या केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथे भाजप चांगले प्रदर्शन करेल. पुदुच्चेरीमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास जेपी नड्डा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही पूर्ण तयारीनिशी आम्ही उतरत आहोत. सर्वपक्षीय भाजपविरोधात मैदानात आहेत. तरीही भाजप चांगली कामगिरी करेल, अशी आशा जेपी नड्डा यांनी व्यक्त केली.

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास

तामिळनाडूमधील विधानसभा निवडणूक म्हणजे भाजपला स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. तामिळनाडूतील राजकारणात भाजपची प्रतिमा आता बदलली असून, ती सकारात्मक झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या योजना तामिळनाडूमध्ये यशस्वीरित्या अमलात आल्या आहेत, असे सांगत पंतप्रधान मोदी विकासाचे राजकारण करतात. तुष्टीकरणाचे नाही. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, असाच पंतप्रधान मोदींचा मंत्र आहे. हाच अजेंडा दक्षिणेतील विधानसभा निवडणुकांमध्ये पुढे नेला जाईल, असे जेपी नड्डा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीKeralaकेरळTamilnaduतामिळनाडूpuducherry-pcपुडुचेरी