शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

Kailash Vijayvargiya : "काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या बूथ अध्यक्षाला 51 हजार रुपये बक्षीस देईन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 10:35 IST

BJP Kailash Vijayvargiya : भाजपा नेते कैलाश विजयवर्गी हे पुन्हा एकदा विधानामुळे चर्चेत आले आहे. विजयवर्गीय यांनी मतदान केंद्रावर काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या संबंधित 'बूथ अध्यक्षा'ला 51,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

मध्य प्रदेशातीलभाजपा नेते कैलाश विजयवर्गी हे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहे. विजयवर्गीय यांनी मतदान केंद्रावर काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या संबंधित 'बूथ अध्यक्षा'ला 51,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. भाजपाला आशीर्वाद द्या आणि काँग्रेसला वॉर्डमधून एक मतही मिळू नये म्हणून यावेळी मी बक्षीस जाहीर केल्याचे विजयवर्गीय म्हणाले आहेत. 

आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-1 मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विजयवर्गीय हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव असून ते इंदूर आणि इतर जागांवरून 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी पक्षाने आमदारकीचे तिकीट दिल्यापासून त्यांची विधानं अनेकदा चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी तिकीट मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत स्वत:ला 'मोठा नेता' असे संबोधले होते. नंतर कार्यकर्त्यांसमोर ते म्हणाले होते की, पक्षाने तिकीट दिले असेल तर काहीतरी 'मोठा' विचार केला असेल.

"बूथ अध्यक्षाला आम्ही 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊ"

गुरुवारी कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित केलं. येथे विजयवर्गीय म्हणाले, काँग्रेसला एकही मत मिळणार नाही अशा बूथ अध्यक्षाला आम्ही 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊ. कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, आमच्या विरोधकांनी परिसरातील जनताच आपले कुटुंब असल्याचे सांगत सुमारे दोन लाख साड्यांचे वाटप केले आहे. मला यात जायचे नाही, परंतु प्रभागातील जनता चांगली आहे आणि त्यांनी मतदारसंघात कोणतीही विकासकामे न केल्यामुळे येथे (काँग्रेस) एकही मते पडणार नाहीत याची खात्री ते घेतील असं सांगितलं. 

"मला तिकीट दिलं यावर विश्वास बसत नाही"

भाजपाकडून तिकीट मिळाल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये सांगितले होते की, "मला निवडणूक लढवण्याची 'एक टक्काही इच्छा' नाही. ते प्रचार करतील, असा माझा समज होता. आता 'मोठा नेता' झालो आहे. दररोज 8 सभा घेण्याची योजना आखण्यात आली. पाच हेलिकॉप्टरने आणि तीन कारने. पण आपल्याला जे वाटते ते सत्य नाही. मी निवडणूक लढवावी आणि पुन्हा एकदा जनतेत जावे, अशी देवाची इच्छा होती. त्यामुळेच पक्षाने तिकीट दिले." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसPoliticsराजकारण