शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Bihar Politics Tejashwi Yadav: "भाजपा ज्या विधानसभेत हरतो, तिथे तीन जावई पाठवतो"; तेजस्वी यादवांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 16:44 IST

ते ३ जावई नक्की कोणते ते देखील त्यांनी सांगितले.

Bihar Politics Tejashwi Yadav: बिहार विधानसभेत आज महाआघाडी सरकार विश्वासदर्शक ठराव सिद्ध करत आहे. यापूर्वी सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते यांनी आपापली मते मांडली. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी विधानसभेत भाजपावर टीकास्त्र सोडले. "ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता येत नाही, जिथे भाजपा हरतो, तिथे ते तीन जावई पाठवतात. हे तीन जावई म्हणजे सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स. या तिघांना अशा राज्यांमध्ये पुढे केले जाते", असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला.

"बिहारवर अन्याय झाला आहे, त्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपाला सोडून देण्याचा हा निर्णय घेतला आहे. तो ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे भाजपा आम्हाला घाबरवेल हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही घाबरत नाही. आम्ही समाजवादाचे भाग आहोत आणि वंशज आहोत. त्यामुळे भाजपाने हवे तसे षडयंत्र केले तरीही आम्ही घाबरणार नाही. देशाचे तुकडे होऊ देणार नाही आणि समाजवाद संपू देणार नाही", असा विश्वास तेजस्वी यादवांनी व्यक्त केला.

बिहार विधानसभेत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते तारकिशोर प्रसाद यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जनमताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. "नितीश कुमार पंतप्रधान होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेत सर्व काही विसरले आहेत. नितीश कुमार जेव्हा आमच्यासोबत आले होते, त्यावेळी राजदने त्यांच्यावर टीका करताना खूप काही बोल लावले होते. यानंतरही त्यांनी पुन्हा त्यांच्यासोबतच सरकार स्थापन केले. नितीश कुमार खूप आतल्या गाठीचा माणूस असल्याचे अनेक लोक सांगतात. नितीशकुमार फक्त भोळे दिसतात, पण आता ते बिहारसाठी पल्टूकुमार आहेत, त्यांच्याकडे विश्वासार्हता शिल्लक राहिली नाही", अशी टोलेबाजी सभागृहात बोलताना भाजपाच्या तारकिशोर प्रसादांनी आधी केली.

"जनतेची इच्छा असेल नितीश कुमार पंतप्रधान होऊ शकतात. नितीश कुमार पंतप्रधानांबाबत कोणत्याही संभ्रमात राहत नाहीत. पूर्वी आम्ही १२६ च्या बळावर बिहारची सेवा करत होतो, आता १६४ च्या बळावर बिहारची सेवा करत आहोत", असे जेडीयूच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री विजय चौधरी यांनी तारकिशोर प्रसाद यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सांगितले.

टॅग्स :BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार