शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

Bihar Politics Tejashwi Yadav: "भाजपा ज्या विधानसभेत हरतो, तिथे तीन जावई पाठवतो"; तेजस्वी यादवांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 16:44 IST

ते ३ जावई नक्की कोणते ते देखील त्यांनी सांगितले.

Bihar Politics Tejashwi Yadav: बिहार विधानसभेत आज महाआघाडी सरकार विश्वासदर्शक ठराव सिद्ध करत आहे. यापूर्वी सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते यांनी आपापली मते मांडली. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी विधानसभेत भाजपावर टीकास्त्र सोडले. "ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता येत नाही, जिथे भाजपा हरतो, तिथे ते तीन जावई पाठवतात. हे तीन जावई म्हणजे सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स. या तिघांना अशा राज्यांमध्ये पुढे केले जाते", असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला.

"बिहारवर अन्याय झाला आहे, त्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपाला सोडून देण्याचा हा निर्णय घेतला आहे. तो ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे भाजपा आम्हाला घाबरवेल हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही घाबरत नाही. आम्ही समाजवादाचे भाग आहोत आणि वंशज आहोत. त्यामुळे भाजपाने हवे तसे षडयंत्र केले तरीही आम्ही घाबरणार नाही. देशाचे तुकडे होऊ देणार नाही आणि समाजवाद संपू देणार नाही", असा विश्वास तेजस्वी यादवांनी व्यक्त केला.

बिहार विधानसभेत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते तारकिशोर प्रसाद यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जनमताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. "नितीश कुमार पंतप्रधान होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेत सर्व काही विसरले आहेत. नितीश कुमार जेव्हा आमच्यासोबत आले होते, त्यावेळी राजदने त्यांच्यावर टीका करताना खूप काही बोल लावले होते. यानंतरही त्यांनी पुन्हा त्यांच्यासोबतच सरकार स्थापन केले. नितीश कुमार खूप आतल्या गाठीचा माणूस असल्याचे अनेक लोक सांगतात. नितीशकुमार फक्त भोळे दिसतात, पण आता ते बिहारसाठी पल्टूकुमार आहेत, त्यांच्याकडे विश्वासार्हता शिल्लक राहिली नाही", अशी टोलेबाजी सभागृहात बोलताना भाजपाच्या तारकिशोर प्रसादांनी आधी केली.

"जनतेची इच्छा असेल नितीश कुमार पंतप्रधान होऊ शकतात. नितीश कुमार पंतप्रधानांबाबत कोणत्याही संभ्रमात राहत नाहीत. पूर्वी आम्ही १२६ च्या बळावर बिहारची सेवा करत होतो, आता १६४ च्या बळावर बिहारची सेवा करत आहोत", असे जेडीयूच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री विजय चौधरी यांनी तारकिशोर प्रसाद यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सांगितले.

टॅग्स :BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार