Video - "माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं"; चेंगराचेंगरीत आई गमावलेल्या मुलाचा टाहो, प्रशासनावर संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:09 IST2026-04-01T12:06:34+5:302026-04-01T12:09:32+5:30
साहिल राज या तरुणाने रडत रडत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Video - "माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं"; चेंगराचेंगरीत आई गमावलेल्या मुलाचा टाहो, प्रशासनावर संताप
बिहारच्या नालंदा येथे मंगळवारी सकाळी शीतला माता मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे पाटण्याला हलवण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर आता मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.
मृतांचे नातेवाईक यंत्रणेला दोष देत असून सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. जत्रेमध्ये सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साहिल राज या तरुणाने रडत रडत आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, "मला काहीच माहीत नाही, माझी आई गेली. पोस्टमार्टम रूममध्ये माझी आई पडली आहे. सरकारची कोणतीही व्यवस्था तिथे नव्हती. मघडा जत्रेत प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. या देशात सामान्य लोकांच्या जीवाची काहीच किंमत उरलेली नाही."
VIDEO | Nalanda, Bihar: Sahil Raj breaks down as he lost his mother in stampede at the Maghra Shitla Mata Mela.
— Press Trust of India (@PTI_News) March 31, 2026
He says, “I could not even see my mother for the last time. There was no proper arrangements during the Mela.”#Nalandastampede
(Full video available on PTI Videos… pic.twitter.com/oUyQ8krOxi
"शीतला मंदिरातील मृत्यूला सरकारच जबाबदार, लोकांच्या सुरक्षेची चिंता नाही"; काँग्रेसचा हल्लाबोल
साहिलने सांगितलं की, त्याची आई सकाळी चार वाजता जत्रेला जाण्यासाठी घरातून निघाली होती. तो स्वतः कामासाठी आणि शिक्षणासाठी पाटण्यात राहत असल्याने आईला शेवटच्या क्षणी पाहूही शकला नाही. "माझं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे. आता मी कोणाच्या आधारावर जगू?" असा सवाल त्याने उपस्थित केला.
"लोक एकमेकांवर पडले", शीतला मंदिरात चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
Video - भयंकर! नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू; १२ जण जखमी
मूळचा इस्लामपूरचा असलेला साहिल पाटण्यात शिकतो आणि छोटं-मोठं काम करतो. चेंगराचेंगरीची बातमी समजताच त्याने घटनास्थळी धाव घेतली. तो संतापून म्हणाला, "माणूस तीर्थस्थळी कशासाठी जातो? शांतता आणि दर्शनासाठी... माझ्या आईचं वय काय होतं? एखादी वयस्कर व्यक्ती असती तर समजू शकलो असतं, पण आता आम्ही काय करू शकतो?" या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.