शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

Bihar Assembly Election Results : "महाआघाडीला पचणार नाही एक्झिट पोलच्या विजयाचा लाडू, एनडीएचे सरकार बनणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 09:21 IST

Bihar Assembly Election Results : बहुतांश एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीकडे कौल दिसत आहे. मात्र, निकाल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने लागेल असा भाजपाला विश्वास आहे. 

ठळक मुद्देसर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारणार, हे पाहण्याचे ठरणार आहे.

नवी दिल्ली / पटना :  बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम फेरीच्या मतदानानंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीकडे कौल दिसत आहे. मात्र, निकाल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने लागेल असा भाजपाला विश्वास आहे. 

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी सोमवारी मतमोजणीच्या एक दिवस आधी दावा केला की, बिहारमध्ये एनडीए सरकार प्रचंड बहुमताने बनणार आहे आणि नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील. त्यांनी एक निवेदन जारी केले की, "बिहारमधील तीन टप्प्यांच्या निवडणुका संपल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने मतदारांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले आहे."

बिहार एक्झिट पोलमधील अंदाज फेटाळत शाहनवाज हुसैन यांनी निकाल एनडीएच्या बाजूने असेल, असा दावा केला आहे. ते म्हणाले, " १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बिहारमध्ये जबरदस्त बहुमताने एनडीए सरकार स्थापन होणार आहे आणि नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहतील." याचबरोबर, २०१५ च्या बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलचा संदर्भ देत त्यावेळी जनता दल संयुक्त एनडीएचा भाग नसताना बहुतेक अंदाजांमध्ये भाजपा सरकार स्थापन केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी एक्झिट पोल चुकीचे ठरले होते. याशिवाय इतर बर्‍याच प्रसंगी एक्झिट पोलमध्ये केलेले अंदाज चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहेत, असे हुसैन म्हणाले. 

एक्झिट पोलच्या आधारे महाआघाडीद्वारे लाडू बनवण्याच्या दाव्यावर हुसैन म्हणाले की, अजून काहीवेळ महाआघाडीचे लोक लाडू खातील. निकालानंतर ते लाडू पचवणार नाहीत. बिहारची जनता कधीही महाआघाडीला पचवणार नाही. आरजेडीचा कारभार सर्वांनी पाहिला आहे. तसेच, हुसैन यांनी दावा केला की, 'या आकलनाच्या आधारे आम्ही असे म्हणू शकतो की, महाआघाडीसाठी एक्झिट पोलचा निकाल दोन दिवसांचा आनंद आहे. वास्तविक निकाल दहा तारखेला येतील तेव्हा एनडीए सरकार बिहारमध्ये प्रचंड बहुमताने परत येईल आणि नितीशकुमार बिहारच्या हितासाठी पुढील पाच वर्ष सुशासन आणि विकासाचे राज्य स्थापन करतील.

नितीशकुमार की तेजस्वी, कोण बाजी मारणार?बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. तमाम मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला दिलेले झुकते माप आणि तरुणांमध्ये तेजस्वी यांच्याविषयी असलेले आकर्षण या पार्श्वभूमीवर बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी यांना पसंती दिली जाते की, मतदार नितीशकुमार यांना चौथ्यांदा संधी देतात, याचा फैसला आज होणार आहे. बिहारमधील या निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारणार, हे पाहण्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार