शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Video - हृदयस्पर्शी! मुख्याध्यापकांच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडले; सरांचेही डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 15:30 IST

Video - एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सरांना मिठी मारून विद्यार्थी रडत आहेत.

नवी दिल्ली - विद्यार्थी आणि शिक्षकांमधील नातंच अनमोल असतं. काही शिक्षक असे असतात जे विद्यार्थ्यांना प्रचंड आवडतात. त्यांना लळा लावतात. पण अनेकदा बदलीनंतर त्यांना शाळा सोडावी लागते. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. बिहारच्या सहरसामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सरांना मिठी मारून विद्यार्थी रडत आहेत. मुख्याध्यापक मुलांची समजूत काढत होते पण यावेळी सरांचे डोळे देखील पाणावले. 

मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील सोनपुरा गावात असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक राजीव कुमार सिंह यांची बदली झाली. त्यांना निरोप देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. राजीव कुमार सिंह यांनी सहा महिने मुख्याध्यापक म्हणून काम पाहिलं. सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी खूप चांगलं काम केलं. प्रामुख्याने शाळेचा कायापालट केला. त्यामुळेच विद्यार्थ्यांना ते खूपच आवडायचे.

मुख्याध्यापक राजीव कुमार सिंह यांना निरोप देताना विद्यार्थी भावुक झाले. राजीव कुमार यांनी फक्त सहाच महिने मुख्याध्यापक म्हणून काम केलं. या कालावधीत त्यांनी शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यास प्राधान्य दिलं. सरकारच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं. राजीव कुमार यांना मुलांची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेतली. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष दिल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

सहा महिन्यांनंतर राजीव कुमार सिंह यांच्या बदलीचा आदेश आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. विद्यार्थिनी मुख्याध्यापकांना मिठी मारून रडल्या. त्यांना रडताना पाहून राजीव कुमार यांचेही डोळे पाणावले. भावुक झालेल्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींना समजावलं. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनी आणि मुख्याध्यापकांमधील हा जिव्हाळा पाहून सर्वांनाच गहिवरून आलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाStudentविद्यार्थी