शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

केजरीवालांना मोठा दिलासा: मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठीची याचिका हायकोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 2:44 PM

अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

Arvind Kejriwal ( Marathi News ) :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. कारण कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. हे राजकीय प्रकरण असून ते न्यायपालिकेच्या अखत्यारित येत नसल्याचं सांगत कोर्टाने याबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सध्या तरी केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कायम राहणार आहेत.

मद्य धोरणप्रकरणी ईडीने अटक केल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांनी अद्याप मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे तुरुंगात असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपदावरून हटवावं, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात एका नागरिकाकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेप्रकरणी कोर्टात आज सुनावणी झाली असून कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

अटकेप्रकरणी अंतरिम दिलासा मिळालेला नाही!

अरविंद केजरीवाल यांनी ईडीने केलेल्या अटकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र केजरीवाल यांना काल दिल्ली हायकोर्टाने अंतरिम दिलासा देण्यास नकार देत त्यांच्या याचिकेवर ३ एप्रिलपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. केजरीवाल यांची ईडी कोठडी आज संपणार असून, त्यांना राऊज ॲव्हेन्यूच्या पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येईल. केजरीवाल यांची ईडीची कोठडी संपताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय सज्ज झाली आहे. 

दरम्यान, दिल्लीचे सरकार तुरुंगातून चालू देणार नाही, अशी कठोर भूमिका उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी घेतली आहे. उपराज्यपालांच्या विधानामुळे दिल्लीच्या राजकारणात हालचाली वाढण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीdelhiदिल्ली