शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 17:50 IST

Election Commission OF India: २०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये साटंलोटं झाल्याचा आणि मतांची चोरी करून भाजपाने विजय मिळवला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. एकीकडे हा वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाने देशभरातील ३०० हून अधिक राजकीय पक्षांना दणका दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी  हे मतदार याद्या, बनावट मतदार यासारख्या विविध मुद्द्यांवरून केंद्रीय निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. त्यातच २०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये साटंलोटं झाल्याचा आणि मतांची चोरी करून भाजपाने विजय मिळवला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. एकीकडे हा वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाने देशभरातील ३०० हून अधिक राजकीय पक्षांना दणका दिला आहे.

याबाबत माहिती देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, सर्व पुरावे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिफारशींचा विचार केल्यानंतर निवडणूक आयोगाने ३३४ पक्षांना पक्षांच्या यादीतून हटवले. आता देशभरातील २ हजार ८५४ राजकीय पक्षांपैकी २ हजार ५२० पक्ष उरले आहेत. निवडणूक आयोगाने पुढे म्हटले आहे की, हे पक्ष आता लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ मधील कलम २९बी  आणि कलम २९सी तसेच निवडणूक चिन्ह आदेश १९६१ मधील तरतुदींनुसार कुठलाही लाभ घेण्यास अपात्र असतील. आता या आदेशाबाबत आक्षेप असलेला कुठलाही पक्ष ३० दिवसांच्या आत आयोगामध्ये आव्हान देऊ शकतो.

दरम्यान, या पक्षांना यादीमधून हटवणे हा निवडणूक आयोगाच्या व्यापक धोरणाचा भाग आहे. याअंतर्गत केवळ कादोपत्री अस्तित्व असलेल्या आणि प्रत्यक्षात सक्रिय नसलेल्या पक्षांना हटवले जात आहे. जून २०२५ मध्ये निवडणूक आयोगाने या मोहिमेची सुरुवात केली होती. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मुख्य निवडणूक आयुक्तांना वरील अटींची पूर्तता करण्यासंदर्भात ३४५ पक्षांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.    

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगIndiaभारत