शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

भोपाळ दुर्घटना; 350 टन विषारी कचरा अजूनही निच:याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: November 29, 2014 02:02 IST

भोपाळच्या वायुगळती कांडात निर्माण झालेला कचरा त्या घटनेला 29 वर्षे लोटूनही तसाच पडून असून भविष्यातही त्याची विल्हेवाट लागण्याची शक्यता दिसत नाही.

भोपाळ : जगातील सर्वात मोठा औद्योगिक अपघात म्हणून गणल्या गेलेल्या भोपाळच्या वायुगळती कांडात निर्माण झालेला कचरा त्या घटनेला 29 वर्षे लोटूनही तसाच पडून असून भविष्यातही त्याची विल्हेवाट लागण्याची शक्यता दिसत नाही. युनियन कार्बाईडच्या परिसरात पडलेल्या या 35क् टन विषारी कच:यामुळे पाणी व हवेचे प्रदूषण  होत असून पर्यावरणालाही धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
या कच:याच्या निमरूलनासाठी केंद्र, राज्य सरकार व उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले; मात्र त्याला झालेल्या विरोधामुळे हा कचरा तसाच पडून राहिला. 
मागील दशकात उच्च न्यायालयाने हा कचरा मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील पिथमपूर येथे जाळण्याचे आदेश दिले होते; मात्र तेथील स्वयंसेवी संस्थांनी त्याला तीव्र विरोध केल्याने तसे करता आले नाही. येथे होत असलेला विरोध पाहून न्यायालयाने तो गुजरातच्या अंकलेश्वर येथे जाळण्याचे निर्देश दिले; मात्र तेथील नागरिकांनी त्याला विरोध केला. 
पुढे हा कचरा नागपुरात जाळण्याचे निश्चित झाले. तथापि, महाराष्ट्र सरकारने हा कचरा जाळण्यात आपली असमर्थता व्यक्त केली. एका जर्मन कंपनीने हा कचरा जर्मनीत नेऊन जाळण्याचा प्रस्ताव दिला होता; मात्र त्या प्रस्तावाला जर्मन सरकारनेच विरोध केला होता. (वृत्तसंस्था)
 
4सर्वोच्च न्यायालयाने 17 एप्रिल रोजी या कच:यापैकी 1क् टन कचरा पिथमपूरमध्ये चाचणी स्वरूपात जाळण्याचे आदेश दिले होते. कोच्ची येथील एका संस्थेने दहा टन कचरा पिथमपूर येथे नष्ट केला. यासंदर्भातील अहवाल केंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) न्यायालयाला सादरही केला आहे. आता याबाबत सीपीसीबीने निर्देश दिले तर उरलेल्या कच:याचीही विल्हेवाट लावण्यासाठी तो पाठविला जाईल, असे भोपाळ वायुगळती व पुनर्वसन विभागाचे उपसचिव के.के. दुबे यांनी सांगितले. या कच:याच्या निमरूलनासाठी या प्रकरणी स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या मंडळाने 315 कोटींची रक्कम राखीव ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले.