शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

Bharat Bandh: ...अन् राहुल गांधींनी वापरला मोदींचा 'तो' डायलॉग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 12:46 PM

पंतप्रधान मोदी अनेकदा वापरत असलेला डायलॉग राहुल गांधींनी भाषणात वापरला

नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं पुकारलेल्या 'भारत बंद'ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात दिल्लीत मोर्चा काढला. राजघाटावरुन सुरू झालेल्या या मोर्चाची सांगता रामलीला मैदानात झाली. याठिकाणी काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात धरणे आंदोलन केलं. कैलास मानसरोवर यात्रेवरुन परतलेल्या राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदींनी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची भाषा केली होती. शेतकऱ्यांना समस्या संपवण्याचं आश्वासन दिलं होतं. लोकांनी मोदींवर विश्वास ठेवला. मात्र त्यांनी जनतेची साफ निराशा केली, अशा शब्दांमध्ये राहुल गांधीनी मोदींवर शरसंधान साधलं. यावेळी राहुल यांनी मोदींचा डायलॉग वापरत त्यांच्यावरच टीका केली. 'गेल्या 70 वर्षांमध्ये जे झालं नाही, ते गेल्या 4 वर्षांमध्ये होतं, असं मोदी अनेकदा म्हणतात. मोदी अगदी योग्य बोलतात. आज देशाचा एक नागरिक दुसऱ्या व्यक्तीशी भांडत आहे. त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. कुठे वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्तींमध्ये संघर्ष सुरू आहे, तर कुठे दोन जातींमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल गांधी बरसले. मोदी देशवासीयांच्या समस्यांवर मूग गिळून गप्प बसतात, असाही आरोप राहुल यांनी केला.  इंधन दरवाढ, महिलांवरील बलात्कार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी याबद्दल मोदी काहीच बोलत नाही. 2014 मध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला. मात्र भाजपा सरकारनं गेल्या 4 वर्षांमध्ये काय केलं, असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला. सध्या देशातील कोणालाही योग्य दिशा सापडत नाही. फक्त मोदींच्या उद्योगपती मित्रांना योग्य दिशा सापडली आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर उद्योगपतीधार्जिणे असल्याचा आरोप केला. 'तरुणांकडे रोजगार नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत. सर्वसामान्य जनता महागाईमुळे गॅसवर आहे. चार वर्षांपूर्वी 400 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 800 रुपयांचा झाला आहे. मात्र तरीही मोदी मूग गिळून गप्प आहेत. आज देशातील काही मोजक्याच लोकांना योग्य दिशा सापडली आहे. मोदींच्या उद्योगपती मित्रांचं सर्वकाही उत्तम सुरू आहे,' असं राहुल गांधी म्हणाले.  

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस