धक्कादायक! बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 12:46 PM2019-06-06T12:46:30+5:302019-06-06T12:47:47+5:30

भागलपूर जिल्ह्यात बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

bhagalpur after the rape the victim burned to destroy evidence in bhagalpur in bihar | धक्कादायक! बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळलं

धक्कादायक! बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळलं

Next
ठळक मुद्देभागलपूर जिल्ह्यात बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

भागलपूर - बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बिहारमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भागलपूर जिल्ह्यात बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील भागलपूरमध्ये एका 22 वर्षीय बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

भागलपूल जिल्ह्यातील शिवनारायणपूर पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. बुधवारी (5 जून) नवटोलिया गावात 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने केलेल्या गुन्ह्याचा पुरावा मागे राहू नये यासाठी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे संबंधित तरुणीच्या भाऊजीनेच हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये तरुणी 65 टक्के भाजली आहे. तरुणीला तातडीने उपचारासाठी जेएलएनएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका तरुणाला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला होता. विवाहीत महिलेशी लग्न केलं म्हणून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. ओरलहिया गावात ही घटना घडली. श्रवण महतो असे मृत तरुणाचे नाव असून तो ओरलहिया गावाचा रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, श्रवणचे एका महिलेशी लग्न झाले होते. मात्र गावातील दुसऱ्या एका विवाहीत महिलेशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे श्रवणने आपल्या पहिल्या पत्नीला सोडून विवाहीत महिलेशी पळून जावून लग्न केलं होतं. काही दिवस ते दोघेही फरार होते. मात्र काही दिवसांनी ते पुन्हा गावात परतले आणि पंचायतीकडे त्यांना गावात परत घेण्याची विनंती केली होती. श्रवणने पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिच्या पहिल्या पत्नीचे नातेवाईक नाराज झाले होते. संतापाच्या भरात त्यांनी श्रवणला बेदम मारहाण करत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 70 टक्क्यांहून अधिक भाजल्याने श्रवणचा मृत्यू झाला होता. 

 

Web Title: bhagalpur after the rape the victim burned to destroy evidence in bhagalpur in bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.