शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Belgaum Election : 'दादागिरी'चा अधिकार आमच्याकडं, बेळगावच्या सभेतून संजय राऊतांचे मोदींना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 22:33 IST

बेळगावबद्दल बोलताना, काँग्रेसने, पंडीत नेहरुंनी चूक केलीय, तुम्ही दुरुस्त करा. त्या काश्मीरमध्ये पंडित नेहरुंनी कलम 370 लावले, ती चूक तुम्ही दुरूस्त केलीच ना. मग, ही चूकही तुम्ही दुरूस्त करा, असे आवाहन खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे

ठळक मुद्देबेळगावबद्दल बोलताना, काँग्रेसने, पंडीत नेहरुंनी चूक केलीय, तुम्ही दुरुस्त करा. त्या काश्मीरमध्ये पंडित नेहरुंनी कलम 370 लावले, ती चूक तुम्ही दुरूस्त केलीच ना. मग, ही चूकही तुम्ही दुरूस्त करा, असे आवाहन खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे

मुंबई - बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊतबेळगावमध्ये दाखल आले होते. बेळगावमधील प्रचारसभेत राऊत यांनी तुफान फटकेबाजी करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जबरी टीका केली. पण, सभा होण्याआधीच बेळगाव प्रशासनाकडून सभेला विरोध करत व्यासपीठ आणि साऊंड सिस्टमची मोडतोड करण्यात आली होती. खुद्द संजय राऊत यांनी या घटनेसंदर्भात ट्विट केलं आणि बेळगाव प्रशासनाला कडक शब्दात इशारा देखील दिला. त्यानंतर, मोठ्या गर्दीत राऊत यांची जाहीर सभा पार पडली.  

"बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरुवात. संयुक्त महाराष्ट्र चौकातील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले..सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय", असा रोखठोक इशारा संजय राऊत यांनी ट्विटमधून दिला होता. त्यानंतर, आयोजित सभेत बोलताना थेट पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारलाच दम भरला. 

बेळगावबद्दल बोलताना, काँग्रेसने, पंडीत नेहरुंनी चूक केलीय, तुम्ही दुरुस्त करा. त्या काश्मीरमध्ये पंडित नेहरुंनी कलम 370 लावले, ती चूक तुम्ही दुरूस्त केलीच ना. मग, ही चूकही तुम्ही दुरूस्त करा, असे आवाहन खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. तसेच, माझं आणि कर्नाटक सरकारचं भांडण नाही, कारण त्यांच्या हातातच काही नाही. ज्यांचं मुख्यमंत्रीपद ते ठरवतात त्यांच्या हातात काय आहे, हा लढा केंद्र सरकारशी आहे. तुम्ही न्यायाची बाजू घेत असाल तर, मराठी जनतेचं, मराठी अस्मीतेचं, महाराष्ट्राच्या एकीकरणाचं हे विराट दर्शन पाहा, असे म्हणत राऊत यांनी बेळगावमधील गर्दीकडे हात दाखवून लक्ष वेधलं. तसेच, लोकशाही मानत असाल तर न्याय द्या. 

मी मगाशी फार चांगल्या घोषणा ऐकत होतो, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी. नाहीच चालणार, दादागिरीचा अधिकार आमच्याकडंय. आमचा जन्मच त्यासाठी झालाय शिवसेनेचा. तानाशाही तुम्ही काय करताय, आम्ही हिटलरचे बाप आहोत, बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राने मनात आणलं, नाक दाबायचं ठरवलं तर तडफड होईल, असे म्हणत राऊत यांनी मोदींवर जबरी टीका केली.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतcorona virusकोरोना वायरस बातम्याbelgaonबेळगावShiv Senaशिवसेना