शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

Atmanirbhar Bharat Abhiyan: 'परवडणारी घरं' देणारी योजना आता मार्च 2021 पर्यंत; मध्यमवर्गीयांसाठी मोठी बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 5:29 PM

Atmanirbhar Bharat Abhiyan: गृहनिर्माण उद्योगाला चालना मिळेल, मध्यमवर्गाला परवडणारी घरं मिळतील; अर्थमंत्र्यांना विश्वास

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत महत्त्वाच्या घोषणा करताना स्थलांतरित मजूर, लहान शेतकरी, शेतमजूर यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी गृहनिर्माण आणि मध्यम वर्गासाठीही मोठी घोषणा केली. मध्यमवर्गीयांना 'परवडणारी घरं' देणारी योजना मार्च 2021 पर्यंत राबवण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.मध्यमवर्गासाठी 6-18 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी साधी, परवडणारी घरं मिळण्यासाठी क्रेडिट लिंक सबसिडी योजना लागू करण्यात आली होती. ही योजना मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत 3.3 लाख परिवारांना याचा फायदा झाला आहे. मात्र आता ही योजना मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आल्यानं आणखी 2.5 लाख परिवारांना फायदा होईल. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळेल. गृहनिर्माण क्षेत्रातली कामं सुरू झाल्यानं लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि मध्यमवर्गाला स्वस्तात घरं मिळतील, असं सीतारामन म्हणाल्या. काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी महत्त्वाच्या घोषणा करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी आज स्थलांतरित मजूर, शेतकरी, फेरीवाल्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. देशातील 3 कोटी शेतकऱ्यांनी 4 लाख 22 हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी तीन महिन्यांचा दिलासा देण्यात आला आहे. किसान क्रेडीट कार्डद्वारे 25 हजार कोटी रुपये उपलब्ध करण्यात आल्याचे सीतारामन यांनी सांगितले.  पुढील दोन महिने स्थलांतरित कामगारांना मोफत जेवण देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा कामगारांना 5 किलो तांदूळ, किलो चणा डाळ मोफत देण्यात येणार आहे. 8 कोटी कामगारांना याचा फायदा होईल. यासाठी 3500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामगारांना धान्य मिळेल याची जबाबदारी राज्यांनी घ्यायची आहे, असे सीतारामन म्हणाल्या. Atmanirbhar Bharat Abhiyan देशात कुठेही रेशनचे धान्य मिळणार; कामगारांना परवडणारी भाडेकरारावर घरे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन