शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Assam Rain : हाहाकार! आसामला पावसाचा तडाखा, मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पुरामुळे परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 10:25 AM

Assam Rain : पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - आसामला पावसाचा तडाखा बसला आहे. राजधानी गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पावसामुळे बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. मात्र, बुधवारी पावसामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. बोरगाव येथे मंगळवारी दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याचाही यात समावेश आहे. 

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, गीतानगर, सोनापूर, कालापहार आणि निजारापार भागात भूस्खलनामुळे ढिगारा साचल्याने रस्ते बंद झाले आहेत. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झाले आहेत. अनिल नगर, नवीन नगर, राजगड लिंक रोड, रुक्मिणीगाव, हाटीगाव आणि कृष्णा नगर या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात NDRF आणि SDRF कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

जनजीवन विस्कळीत

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटींचा वापर केला जात आहे. पुरात अडकलेल्या लोकांची सुटका आणि त्यांना मदत साहित्य पुरवण्याचं काम सुरू आहे. आसाम वीज वितरण कंपनी लिमिटेड (APDCL) मंगळवारपासून वीज नसलेल्या शहरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी चोवीस तास काम करत आहे. पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवण्यात आले आहेत. अत्यावश्यक गरज असेल तेव्हाच लोकांनी घराबाहेर पडावे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

अतिवृष्टीचा इशारा

कामरूप महानगर उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) जारी केलेल्या पावसाचा इशारा लक्षात घेऊन वर्ग बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आसाममध्ये 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे आसाममध्ये पूर आला होता. आता मान्सूनच्या आगमनानंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसामRainपाऊस