शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

राज्यात मदरसा आणि संस्कृत शाळा बंद होणार, शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:48 AM

'राज्य सरकार धार्मिक संस्थांना निधी देऊ शकत नाही. '

गुवाहाटी : आसामध्ये राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व मदरसा आणि संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सुरु असणाऱ्या या  धार्मिक शाळांचे येत्या काही महिन्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. 

राज्य सरकार धार्मिक संस्थांना निधी देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व मदरसा आणि संस्कृत शाळांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांध्ये बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आसामचेशिक्षण मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी सांगितले. तसेच, स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक संघटनांकडून चालविण्यात येणारे मदरसे सुरू राहतील. मात्र, हे नियमांच्या चौकटीत असतील, असेही हेमंत विश्व शर्मा म्हणाले.  

हेमंत विश्व शर्मा म्हणाले, "धार्मिक उद्देशांसाठी धर्म, धार्मिक शास्त्र, अरबी आणि इतर भाषांमध्ये शिकविण्याचे काम सरकारचे नाही. जर स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक संघटना आपल्या पैशातून धर्माचे शिक्षण देत असेल, तर त्यामध्ये काहीच अडचण नाही. मात्र, हे सुद्धा नियमांच्या चौकटीत राहून करावे लागणार आहे.", याशिवाय, मदरशांमध्ये जर कुराण शिकविण्यासाठी राज्याचा निधी वापरला जात असेल, तर आपल्याला गीता आणि बायबल सुद्धा शिकवावे लागेल, असे हेमंत विश्व शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, आसाम सरकारच्या मदरसा शिक्षा बोर्डच्या माहितीनुसार, राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणारे एकूण 612 मदरसे आहेत. या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना इस्लामिक शिक्षण यासोबत विविध विषय शिकविले जातात. या मदरशांसोबत सरकारी अनुदानावर चालणाऱ्या जवळपास 101 संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्कृत शाळांमध्ये वैदिक शिक्षणासोबत विविध विषयांचे शिक्षण दिले जाते. 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे

ठाकरे सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका किती? ताळमेळच लागेना

यंदा अतिरिक्त २२ सुट्ट्या!; पाच दिवस आठवड्याचा असाही फायदा

टॅग्स :AssamआसामEducationशिक्षण