शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, तब्बल 110 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 09:26 IST

Assam Floods : आसामचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आसाममधीलपूरस्थिती गंभीर झाली आहे. 24 जिल्ह्यांतील तब्बल 25 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. गावे पाण्याखाली गेली असून आतापर्यंत 110 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे पुरासंबंधित घटनांमध्ये मृतांचा आकडा 84 पर्यंत वाढला आहे. तर राज्यातील पूर आणि भूस्खलनमुळे मृतांची संख्या ही 110 पर्यंत पोहोचली आहे.

आसामचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील 33 जिल्ह्यांमधील 24 जिल्ह्यातील 25 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामध्ये सर्वाधित 4.53 लाख लोक हे गोलपाडामधील आहेत. तसेच बारपेटामध्ये 3.44 लाख लोक आणि मोरीगावातील 3.41 लाखांहून अधिक लोकांनाही पुराचा फटका बसल्याची माहिती मिळत आहे. काझीरंगा अभयारण्यातील 108 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. आसाममधील सध्याच्या पूरस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून घेऊन ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. 

पुराचा फटका बसलेल्या आसामला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी संपर्क साधून राज्यातल्या विविध विषयांची माहिती घेतल्याचं मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. 'पंतप्रधान मोदींनी आसाममधील पूरस्थिती, कोरोना संकट आणि बघजन तेलविहिरीतील आगीबद्दलची माहिती फोनवरून घेतली. त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. या कठीण काळात देश तुमच्यासोबत असून राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असं आश्वासन मोदींनी दिलं, असं सोनोवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नागरिकांना आतापर्यंत राज्य सरकारकडून 99 हजार 176 क्विंटल तांदूळ, 19 हजार 397 क्विंटल डाळ आणि 1 लाख 73 हजार लीटर मोहरीच्या तेलाचा पुरवठा करण्यात आला आहे. सर्व मंत्री आणि आमदारांनी त्यांच्या जिल्ह्यांमधील पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं आहे. राज्यातल्या 30 जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. 167 पूल, 1600 पेक्षा अधिक रस्त्यांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला

CoronaVirus News : अरे व्वा! ऊसाच्या चिपाडापासून 'बायोमास्क' तयार होणार; 'इतक्या' वेळा वापरता येणार, जाणून घ्या फायदे

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! अंत्यसंस्कारासाठी पाहावी लागते वाट, स्मशानभूमी बाहेर रुग्णवाहिकेच्या रांगा

CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती

'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल

टॅग्स :AssamआसामAssam Floodआसाम पूरDeathमृत्यूNarendra Modiनरेंद्र मोदीRainपाऊसfloodपूर