शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जर बलात्काराचा आरोपी पळाला तर एन्काऊंटर पॅटर्नचा वापर केला पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 10:57 IST

Assam CM : कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी (Encounter Policy) योग्य असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मत.

ठळक मुद्देकायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी योग्य असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मतराज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह पार पडली बैठक

आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी (CM Himanta Biswa Sarma) कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी योग्य असल्याचं मोठं वक्तव्य केलं. तसंच महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांच्याविरोधात कठोरपणे कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिली. सोमवारी सर्व पोलीस स्थानकांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

"काही लोकांनी मला सांगितलं की आजकाल गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यातून पळ काढत आहे आणि एन्काऊंटरसारख्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे एक पॅटर्न बनत आहे का?, मी त्यांना हे पोलिसिंग पॅटर्न असायला हवं असं म्हटलं," असं वक्तव्य सरमा यांनी केलं. "बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगारानं पळ ठोकला आणि पोलिसांकडून हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना गोळी चालवावी लागेल. परंतु छातीवर नाही आणि कायद्यानं म्हटलं आहे, तुम्ही पायावर गोळी मारू शकता. आम्हाला आसाम पोलिसांना देशातील सर्वत्कृष्ठ सघटना बनवायची आहे," असंही ते म्हणाले. 

पशूंच्या तस्करीवर भाष्य "गाय आमची माता आहे. ती आम्हाला दुध देते, गोबर देते. ट्रॅक्टर येण्यापूर्वी आम्ही त्यांच्या मदतीनं शेती केली होती आणि आजही ते प्रकार अनेक राज्यांमध्ये सुरू आहेत. परंतु आता लोक पशूंची तस्करी, अंमली पदार्थांच्या तस्करीतही सामील झाले आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही सोडलं जाणार नाही," असंही ते म्हणाले. 

टॅग्स :AssamआसामPoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्रीcowगायCrime Newsगुन्हेगारी