शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

आशियाई विकास बँकेनेही केली भारताच्या विकास दरामध्ये घट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 4:06 AM

आता ५.१ टक्केच; औद्योगिक मंदी, रोखीचे संकट कारणीभूत

नवी दिल्ली : भारताचा या आर्थिक वर्षाचा विकासाचा दर ५.१ टक्के इतकाच असेल, असा अंदाज आशियाई विकास बँकेने व्यक्त केला असून, आर्थिक मंदी व बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्थेची वाढ संथ असेल, असेल असे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे. पुढील वर्षीही विकासाच्या दरात वाढ शक्य आहे, असे, आशियाई विकास बँकेने म्हटले आहे.

मूडीज, फिंच, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या सर्वांनीही भारताचा विकासाचा दर कमी असेल, असे या आधी म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने विकास दर ५ टक्के राहील, असे गेल्याच आठवड्यात पतधोरण बैठकीनंतर म्हटले होते. त्या आधी हा दर ६.१ टक्के असेल, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. आशियाई बँकेने, तसेच मत व्यक्त करताना भारताबरोबरच चीनच्या विकास दरातही घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे रोजगारनिर्मितीला खिळ बसली आहे, तसेच रोखीचे संकटही गडद होत चालले आहे. त्यामुळे विकास दरात वाढ होण्यात अडचणी येत आहे, असे या बँकेने नमूद केले आहे. भारत व चीन या दोन मोठ्या देशांतील मंदीचा परिणाम आशियाई देशांवर होत असल्याचेही या बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. संपूर्ण आशिया खंडात सध्या मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे आशियाई खंडाचा विकास दर ५.२ राहील, असे बँकेचे मत आहे. या आधी हा दर ५.४ टक्के असेल, असे बँकेने म्हटले होते.

व्यापारी युद्धाचा चीनला फटका

आशियाई विकास बँकेने चीनचा विकासदर या वर्षी ६.१ टक्के, तर पुढील वर्षी त्यात आणखी घट होऊ न ५.८ असेल, असे मत व्यक्त केले आहे. अमेरिका व चीनमध्ये सध्या जे व्यापारयुद्ध सुरू आहे, त्याचा चीनचा व्यापार आणि उद्योग यांच्यावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे बँकेने पुढील वर्षी त्या देशाच्या विकास दरात आणखी घट होईल, असे म्हटले आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाbankबँकIndiaभारतReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक