शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

Exclusive: "भाजपा आणि काँग्रेस दोघेही बाजारात बसलेत; एक विकायला, दुसरा खरेदी करायला"- अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 12:49 IST

Arvind Kejriwal Interview : मला माहिती अशी मिळाली की,  २२ मार्चला लॉकडाऊन यासाठी लावण्यात आला की त्यांना मध्य प्रदेशात सरकार बनवायचे होते!

नवी दिल्लीः आमदार विकत घेऊन सरकार पाडणं हे चांगलं राजकारण नाही. हा मतदारांचा विश्वासघात ठरतो. कोणती पार्टी आमदार विकत घेऊन मतदारांचा विश्वास तोडत असेल तर ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे, असं स्पष्ट मत मांडत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर ताशेरे ओढले आहेत. त्याचवेळी, आता काँग्रेसला मत देणं म्हणजे काँग्रेस आपली मतं विकून भाजपचं सरकार बनवणार, असं समीकरण झालं आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.

‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या कोरोनाविरोधातील लढाईसह विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेली दिल्ली आता दहाव्या क्रमांकावर गेली आहे. दिल्लीतील रिकव्हरी रेट 88 टक्क्यांच्या वर आहे. ही लढाई आत्ताच जिंकलो, असं म्हणणं घाईचं ठरेल, मात्र देशाने दिल्ली मॉडेल स्वीकारावं, असं प्रांजळ आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे.   

आम्ही धारावीकडून काही गोष्टी शिकलो; आता देशाने ‘दिल्ली मॉडेल’ स्वीकारावे!

दिलासादायक! मुंबईकर जिंकताय लढाई; रुग्णवाढीचा सरासरी दर 1 टक्क्यापेक्षाही कमी

याच मुलाखतीत, राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तानाट्याबाबत बोलताना, अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना लक्ष्य केलं. मला माहिती अशी मिळाली की,  २२ मार्चला लॉकडाऊन यासाठी लावण्यात आला की त्यांना मध्य प्रदेशात सरकार बनवायचे होते, असा दावा त्यांनी केला. चीन आमच्या भूक्षेत्रात आलाय, कोरोना संपूर्ण देशात आहे. अशा वेळी कोणत्याही सत्ताधारी पक्षाने निवडून आलेल्या राज्य सरकारांमध्ये हस्तक्षेप करू नये. आमदार विकत घेऊन सरकार पाडणे हे चांगले राजकारण नाही. तो जनतेचा विश्वासघात आहे. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष दोषी आहेत. बाजारात बसले आहेत आणि एक विकायला तर दुसरा खरेदी करण्यास तयार आहे, अशी चपराक केजरीवाल यांनी लगावली आहे.

गोव्यात लोकांनी काँग्रेसला मते दिली, काँग्रेसने ती भाजपला विकून टाकली. कर्नाटकात लोकांनी काँग्रेसचे सरकार बनवले, मात्र काँग्रेसने सत्तेची माळ भाजपच्या गळ्यात टाकली. मध्य प्रदेशात लोकांनी काँग्रेसला मते दिली, काँग्रेसने ही मते भाजपला विकली. आता काँग्रेसला मत देणे म्हणजे काँग्रेस आपली मते विकून भाजपचे सरकार बनवणे असे समीकरण झाले आहे,  असा टोला त्यांनी लगावला.

राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन, सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी

"१५ दिवसांत ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील", मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ   

भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांत राज्यपाल आणि उपराज्यपाल केंद्र सरकारच्या दबावात काम करतात, असा आरोप होतो. त्याबद्दल केजरीवाल म्हणाले की, राज्यपाल किंवा उपराज्यपालपद ही एक संविधानिक अस्मिता आहे. त्यांनी नि:पक्षपणे काम करायला हवे. निवडून आलेल्या सरकारच्या निर्णयाबाबत नायब राज्यपालांची भूमिका विरोधी असल्याने आम्हाला न्यायालयात जावं लागलं होतं. पण आता त्यांचं सहकार्य मिळतंय.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टी