शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Exclusive: "भाजपा आणि काँग्रेस दोघेही बाजारात बसलेत; एक विकायला, दुसरा खरेदी करायला"- अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 12:49 IST

Arvind Kejriwal Interview : मला माहिती अशी मिळाली की,  २२ मार्चला लॉकडाऊन यासाठी लावण्यात आला की त्यांना मध्य प्रदेशात सरकार बनवायचे होते!

नवी दिल्लीः आमदार विकत घेऊन सरकार पाडणं हे चांगलं राजकारण नाही. हा मतदारांचा विश्वासघात ठरतो. कोणती पार्टी आमदार विकत घेऊन मतदारांचा विश्वास तोडत असेल तर ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे, असं स्पष्ट मत मांडत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर ताशेरे ओढले आहेत. त्याचवेळी, आता काँग्रेसला मत देणं म्हणजे काँग्रेस आपली मतं विकून भाजपचं सरकार बनवणार, असं समीकरण झालं आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.

‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या कोरोनाविरोधातील लढाईसह विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेली दिल्ली आता दहाव्या क्रमांकावर गेली आहे. दिल्लीतील रिकव्हरी रेट 88 टक्क्यांच्या वर आहे. ही लढाई आत्ताच जिंकलो, असं म्हणणं घाईचं ठरेल, मात्र देशाने दिल्ली मॉडेल स्वीकारावं, असं प्रांजळ आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे.   

आम्ही धारावीकडून काही गोष्टी शिकलो; आता देशाने ‘दिल्ली मॉडेल’ स्वीकारावे!

दिलासादायक! मुंबईकर जिंकताय लढाई; रुग्णवाढीचा सरासरी दर 1 टक्क्यापेक्षाही कमी

याच मुलाखतीत, राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तानाट्याबाबत बोलताना, अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना लक्ष्य केलं. मला माहिती अशी मिळाली की,  २२ मार्चला लॉकडाऊन यासाठी लावण्यात आला की त्यांना मध्य प्रदेशात सरकार बनवायचे होते, असा दावा त्यांनी केला. चीन आमच्या भूक्षेत्रात आलाय, कोरोना संपूर्ण देशात आहे. अशा वेळी कोणत्याही सत्ताधारी पक्षाने निवडून आलेल्या राज्य सरकारांमध्ये हस्तक्षेप करू नये. आमदार विकत घेऊन सरकार पाडणे हे चांगले राजकारण नाही. तो जनतेचा विश्वासघात आहे. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष दोषी आहेत. बाजारात बसले आहेत आणि एक विकायला तर दुसरा खरेदी करण्यास तयार आहे, अशी चपराक केजरीवाल यांनी लगावली आहे.

गोव्यात लोकांनी काँग्रेसला मते दिली, काँग्रेसने ती भाजपला विकून टाकली. कर्नाटकात लोकांनी काँग्रेसचे सरकार बनवले, मात्र काँग्रेसने सत्तेची माळ भाजपच्या गळ्यात टाकली. मध्य प्रदेशात लोकांनी काँग्रेसला मते दिली, काँग्रेसने ही मते भाजपला विकली. आता काँग्रेसला मत देणे म्हणजे काँग्रेस आपली मते विकून भाजपचे सरकार बनवणे असे समीकरण झाले आहे,  असा टोला त्यांनी लगावला.

राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन, सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी

"१५ दिवसांत ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील", मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ   

भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांत राज्यपाल आणि उपराज्यपाल केंद्र सरकारच्या दबावात काम करतात, असा आरोप होतो. त्याबद्दल केजरीवाल म्हणाले की, राज्यपाल किंवा उपराज्यपालपद ही एक संविधानिक अस्मिता आहे. त्यांनी नि:पक्षपणे काम करायला हवे. निवडून आलेल्या सरकारच्या निर्णयाबाबत नायब राज्यपालांची भूमिका विरोधी असल्याने आम्हाला न्यायालयात जावं लागलं होतं. पण आता त्यांचं सहकार्य मिळतंय.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टी