शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

मिशन 'कोसा' ! जवानांनी 6 हजार पूरग्रस्तांना वाचवलं तर 2.5 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 8:25 AM

सांगलीमध्ये पूरस्थिती अद्यापही कायम आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.

नवी दिल्ली - महाराष्ट्रासह केरळ आणि तामिळनाडू राज्यांनाही पुराचा फटका बसला आहे. राज्यातील कोल्हापू, सांगली आणि सातारा येथे पुराच्या पाण्यामुळे हाहाकार माजला आहे. आलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. या पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांसाठी 60 हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तर, सैन्य दलाचे जवानही जीवाची बाजी लावून स्थानिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढताना दिसत आहेत. 

ओडिसा, पंजाब व गुजरातमधील NDRFHQ चे 22, नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके दाखल आहेत सैन्यदलाचे 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात 1 अशी 3 पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात 76 व सांगलीमध्ये 90 बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे. सैन्य दलाचे जवानांच्या कार्याचं स्थानिकांकडून डोळे भरून कौतुक होत आहेत. आमच्यासाठी आम्हाला वाचविणार सैनिकच देव असल्याची भावना तेथील लोकांकडून व्यक्त होत आहे.  

सांगलीमध्ये पूरस्थिती अद्यापही कायम आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. कोल्हापूरपेक्षाही आता शिरोळ तालुक्याची परिस्थिती अजूनही गंभीर राहिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातूनही बोटी तेथे मागवल्या आहेत. कोल्हापूर शहर, चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी नॅपकिन इथंपासून ते अगदी पेस्ट, ब्रशपर्यंत अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत.

शिरोळमध्ये जवळपास 120 लष्कराच्या जवानांनी चार बोटीच्या साहयाने मोहीम राबवली. आपल्या पायांना जखमा झाल्या तरीही, सैन्याचे जवान मलमपट्टी करुन आपले कर्तव्य बजावत आहेत. शासनाची मदत नसतानाही सेवाभावी संस्थामार्फत पूरग्रस्त्तांना जेवण, चहा, नाष्टा दिला जात आहे. महाराष्ट्रासह, केरळ, तामिळनाडूतही पूरस्थिती आहे. याही राज्यात सैन्याचे जवान पूरस्थितीशी लढताना दिसत आहेत. महाराष्ट्रासह केरळ आणि तामिळनाडू येथून सैन्यातील जवानांनी 6000 पूरग्रस्तांना वाचविण्यात आलं असून 15000 नागरिकांची सुरक्षितस्थळी रवानगी करण्यात आली आहे. त्यासाठी, पूरग्रस्त 4 राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये सैन्य दलाच्या 123 तुकड्या कार्यरत आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangliसांगलीIndian Armyभारतीय जवान