शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

‘अरिहंत’च्या यशाने त्रिविध संरक्षणसिद्धता, आण्विक पाणबुडीचे मोदींकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 06:03 IST

पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘आयएनएस अरिहंत’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रधारी आण्विक पाणबुडीने देशाच्या सागरी हद्दीत जरब बसविण्यासाठी पहिली गस्ती सफर यशस्वी केल्याने भारताची त्रिविध आण्विक संरक्षणसिद्धता सोमवारी जगजाहीर झाली.

नवी दिल्ली : पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘आयएनएस अरिहंत’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रधारी आण्विक पाणबुडीने देशाच्या सागरी हद्दीत जरब बसविण्यासाठी पहिली गस्ती सफर यशस्वी केल्याने भारताची त्रिविध आण्विक संरक्षणसिद्धता सोमवारी जगजाहीर झाली. यामुळे भारताकडे शत्रूच्या लक्ष्यावर जमीन, आकाश आणि पाण्याखालूनही अण्वस्त्रांचा अचूक मारा करण्याची सज्जता पूर्ण झाली आहे.पहिल्या गस्ती सफरीवरून परतलेल्या ‘अरिहंत’च्या अधिकाऱ्यांचे आणि नाविकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत औपचारिक स्वागत केले. ‘अरिहंत’च्या यशाने भारताची त्रिविध अण्वस्त्रसिद्धता पूर्ण झाल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आणि या यशाबद्दल नौदलाच्या व वैज्ञानिकांच्या पाठीवर शाबासकीची थापदिली. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या एका निवेदनानुसार मोदींनी संपूर्ण देशासाठी ही एक फार मोठी कामगिरी असल्याचे नमूद केले आणि ‘आयएनएस अरिहंत’ आपल्या नावाप्रमाणे देशाच्या १३० कोटी नागरिकांचे बाह्य धोक्यांपासून संरक्षण करून भारतासभोवतालच्या क्षेत्रात शांततेचे वातावरण सुनिश्चित करण्यात मोठे योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला.सैन्यदलांचे शौर्य आणि वैज्ञानिकांचे बुद्धिकौशल्य यांचे कौतुक करताना मोदी यांनी म्हटले की, यांच्या अथक परिश्रमामुळे अणुचाचणीतून संपादित केलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून देशाच्या संरक्षणासाठी अण्वस्त्रसिद्धतेचे त्रिकूट साध्य करणे शक्य झाले आहे. या यशाने भारताची क्षमता व ती सिद्ध करण्यातील निर्धार याविषयीच्या शंकांचेही ठामपणे निरसन झाले आहे.‘अरिहंत’ नौदलात दाखल झाल्याचे याआधी कधीही अधिकृतपणे जाहीर केले गेले नव्हते. या पाणबुडीचे जलावतरण सन २००९ मध्ये तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केले होते. तेव्हापासून असंख्य नानाविध चाचण्या यशस्वी झाल्यावर ती आॅगस्ट २०१६ मध्ये नौदलात दाखल झाली. ‘अरिहंत’ ८३ मेवॅ क्षमतेच्या अणुभट्टीवर चालते व ती अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे.‘अरिहंत’चे महत्त्वअण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे म्हणजेच त्यांचा फक्त बचावासाठी वापर करण्याचे भारताचे धोरण आहे. त्यादृष्टीने प्रतिहल्ल्याचे साधन म्हणून ‘अरिहंत’ अधिक परिणामकारक ठरेल.कारण जमीन आणि हवेतून सोडता येणारी अण्वस्त्रे शत्रूला हुडकून काढणे तुलनेने सोपे आहे; परंतु कोणताही आवाज न करता पाण्याखाली वावरणारी पाणबुडी हे गनिमीअस्त्र आहे. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndiaभारत