शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:40 IST

Yogi Adityanath News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखीमपूर खीरी येथील दौऱ्यादरम्यान, एक मोठी घोषणा केली आहे. फैजाबादचं अयोध्या आणि इलाहाबादचं प्रयागराज असं नामकरण केल्यानंतर आता योगींनी मुस्तफाबाद शहराचं नामकरण कबाीरधाम असं करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखीमपूर खीरी येथील दौऱ्यादरम्यान, एक मोठी घोषणा केली आहे. फैजाबादचं अयोध्या आणि इलाहाबादचं प्रयागराज असं नामकरण केल्यानंतर आता योगींनी मुस्तफाबाद शहराचं नामकरण कबाीरधाम असं करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. आधीच्या सरकारांच्या काळात प्रयागराजचं इलाहाबाद, अयोध्येचं फैजाबाद आणि कबीरधामचं मुस्तफाबाद असं नाव बदलण्यात आलं होतं. आता आम्ही या शहरांची ओळख त्यांना परत मिळवून देण्याचं काम केलं आहे. विरोधी पक्ष सेक्युलॅरिझमच्या नावाखाली या गोष्टी करायचे मात्र. सेक्युलॅरिझम हे एक थोतांड आहे, असा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी लगावला.

यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, संत कबीरदास यांची वाणी आजही समाजाला मार्गदर्शन करत आहे. त्यांनी निर्गुण भक्तीची अशी पावन धारा प्रवाहित केली जी समाजातील भेदभावाला दूर करून आत्मा आणि परमात्म्याचा संबंध  सोप्या शब्दांमध्ये सर्वसामान्यांना समजावण्यात यशस्वी ठरली आहे.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, गुरू गोविंद दोनो खडे काके लागूं पांव... हा दोहा आजही आम्हाला गुरूच्या महत्त्वाची आठवण करून देतो. शेकडो वर्षे लोटली तरी संतवाणी ही आजही तितकीच प्रासंगिक आहे. कबीर यांनी त्या काळी समाजातीय जातीय विषमतेवर प्रहार केला होता. ‘जाति पाती पुछे न कोई, हरि को भजो सो हरि काई होई’, ही वाणी आपल्या समाजातील एकता आणि अखंडतेचा आधारस्तंभ आहे, असेही योगी म्हणाले.

यावेळी देशाची एकता तोडणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ते म्हणाले की, आजही समाजविरोधी शक्तींपासून सावध करण्याची आवश्यकता आहे. आजही समाजविरोधी शक्ती श्रद्धास्थानांवर प्रकार करण्याचा आणि जातीच्या नावाखाली फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आपण वेळीच आपल्यातील उणिवा ओळखल्या नाहीत, तर हे आजार कॅन्सरप्रमाणे समाजाला खिळखिळे करतील. अशा परिस्थितीत देशभक्ती हीच सर्व समस्यांवरील उपाय आहे. ही भूमी हा केवळ एक जमीनीचा तुकडा नाही, तर ही आमची मातृभूमी आणि पितृभूमी आहे. या भूमीची सेवा हीच खरी उपासना आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mustafabad Renamed 'Kabirdham' in Uttar Pradesh, Yogi Announces

Web Summary : Uttar Pradesh's Mustafabad is now Kabirdham, announced Chief Minister Yogi Adityanath. He criticized previous governments for changing names, emphasizing restoring original identities. Adityanath highlighted Saint Kabir Das's teachings on unity and warned against divisive forces threatening national integrity, advocating patriotism.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ