शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर आनंद महिंद्रांचे ट्विट, विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 20:43 IST

Anand Mahindra New Tweet : गेल्या काही महिन्यांपासून राजस्थानच्या कोटामध्ये शैक्षिणिक दबावाखाली अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Anand Mahindra: देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा (anand mahindra) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते नेहमी प्रेरणादायी आणि मजेशीर/विनोदी पोस्ट टाकत असतात. पण, अलीकडेच त्यांनी एका गंभीर विषयावर पोस्ट लिहून देशातील विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला आहे. 

विद्यार्थ्याच्या आत्महत्येने चिंतेतआनंद महिंद्रा यांनी राजस्थानमधील कोटा शहरातील होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबाबत पोस्ट लिहिली आहे. यावर्षी कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत सूमारे 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याबाबत एका ट्विटर युजरने आनंद महिंद्रा यांना बोलण्याचे आवाहन केले. 

यावर आनंद महिंद्रा म्हणाले की, 'अशा बातम्यांनी तुम्ही जितके व्यथित आहात तितकाच मीही व्यथित आहे. देशाचे उज्ज्वल भविष्य अशाप्रकारे आपले जीवन संपवत असल्याचे पाहून खूप वाईट वाटते. मी कोटाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगू इच्छितो की, जीवनाच्या या टप्प्यावर तुमचे लक्ष्य स्वतःला सिद्ध करणे नसून स्वतःला शोधणे हे असले पाहिजे.'

'कोणत्याही परीक्षेत यश न मिळणे, हा स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचा एक भाग आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, तुम्ही इतर कुठल्या क्षेत्रात निपुन असाल. त्यामुळे शोधत राहा, प्रवास करत राहा. यातूनच तुम्हाला तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी कळतील.' आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ट्विटर युजर्स त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राRajasthanराजस्थानStudentविद्यार्थीDeathमृत्यूTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया