शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah Uttar Pradesh : अमित शाहंनी करुन दिली सर्जिकल स्ट्राईकची आठवण, म्हणाले, "पाकिस्तान विसरला होता हे मनमोहन सरकार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 23:13 IST

अमित शाहंनी आपल्या दौऱ्यादरम्यान काढली सर्जिकल स्ट्राईकची आठवण. साधला युपीए सरकारवरही निशाणा.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी गुरुवारी एका कार्यक्रमादरम्या पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकची (pakistan surgical strike) आठवण काढली. शारदा युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मतदार संवाद कार्यक्रमात त्यांनी याची आठवण केली. पुलवामा (Pulwama Attack), उरी हल्ल्यानंतर (Uri Attack) पाकिस्तानला हे मनमोहन सरकार नाही (manmohan government) तर मोदी सरकार (Modi Government) आहे याचा विसर पडला होता. या सरकारनं सर्जिकल स्ट्राईक करत बदला घेतला, असं अमित शाह म्हणाले. 

पहिले काँग्रेस सरकार होतं आणि त्यांना सपा-बसपाचं समर्थनं होतं. यादरम्यान, पाकिस्तानातून शिरलेले दहशतवादी जवानांचा शिरच्छेद करत होते, परंतु सरकारला कोणताही फरक पडत नव्हता, असं शाह म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी कलम ३७० चा उल्लेखही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याचं काम केलं. परंतु काँग्रेस सोबत सपा-बसपानं याचा विरोध केला. काश्मीरमध्ये दगड तर दूरच खडेही फेकण्याचं धाडस कोणी केली. भारत ही धर्मशाळा नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

"अखिलेश यादवांना पोटदुखी का?"भाजप सरकारकडून कोणावरही कायदेशीर कारवाई केली जाते तेव्हा अखिलेश यादव यांना का पोटदुखी होते. ज्या अखिलेश यादव यांनी आपल्या कार्यकाळात वीजही दिली नाही, ते आज मोफत वीज देण्याची घोषणा करत आहे. भाजपनं उत्तर प्रदेशात १.४१ कोटी गरीबांना मोफच वीज पुरवण्याचं काम केलं आहे. अखिलेश यादव यांना दोन एक्स्प्रेस वे बनवले आणि खुप फोटो काढले. ते मंदिर वहीं बनाएंगे असं म्हणत होते, परंतु तारीख सांगत नव्हते. परंतु आज मंदिर त्याच ठिकाणी बनत असल्याचंही शाह म्हणाले. 

जनतेचं प्रेम२०१९ मध्ये उत्तर प्रदेशच्या जनतेनं खूप प्रेम आणि पाठिंबा दिला. मी २०२२ मध्ये पुन्हा सांगायला आलोय. उत्तर प्रदेश बदलत आहे, तरुण पुढे जात आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न हळूहळू सुटत आहेत. उत्तर प्रदेशात बरंच काही करायचं बाकी आहे. सपा-बसपा युपीला खड्ड्यात टाकण्याचं काम करत होते. त्यांनी जातीवादाच्या आधारे सरकार चालवलं. एका पक्षाने एका जातीचं काम केलं, दुसऱ्या पक्षाने दुसऱ्या जातीचं काम केलं. जे लोक लोकशाही पद्धतीनं पक्ष चालवू शकत नाहीत, ते उत्तर प्रदेशचं सरकार काय चालवणार?, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगBJPभाजपाcongressकाँग्रेस