शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

CAA: राहुल, ममता, केजरीवालांची भाषा इम्रान खान यांच्यासारखीच; शहांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 17:32 IST

कितीही विरोध करा, नागरिकत्व देणारच; शहांचा काँग्रेसवर निशाणा

जबलपूर: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं कितीही विरोध केला तरीही आम्ही सर्वांना नागरिकत्व देणारच, अशा शब्दांत शहा काँग्रेसवर बरसले. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांची भाषा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासारखी असल्याचा आरोप त्यांनी केला. ते मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये बोलत होते.  

भारतावर जितका तुमचा आणि माझा अधिकार आहे, तितकाच अधिकार पाकिस्तानहून आलेल्या शरणार्थींचादेखील असल्याचं शहा म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. 'आज काँग्रेस नेते देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं करत आहेत. पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू शरणार्थींना स्वीकारा, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. मात्र राहुल गांधी आणि काँग्रेसला महात्मा गांधींचा विसर पडला आहे,' अशा शब्दांत शहांनी राहुल गांधींवर टीका केली.  

काँग्रेस पक्ष, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, कम्युनिस्ट पक्ष एकत्र येऊन देशाच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शहांनी केला. नागरिकत्व कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. उलट या कायद्याच्या आधारे नागरिकत्व दिलं जाणार आहे, असं गृहमंत्री म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद असल्यास राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींनी ती शोधून दाखवावी, असं थेट आव्हान शहांनी दिलं. 'काँग्रेसनं धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली. त्यावेळी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमधल्या हिंदू, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीयांना भारतात यायचं आहे. मात्र त्यावेळची परिस्थिती अतिशय वाईट होती. त्यामुळे आपल्या देशातल्या सर्व नेत्यांनी त्यांना तिथेच राहण्याचा सल्ला दिला. भविष्यात तुम्ही भारतात याल, तेव्हा तुमचं स्वागत होईल. तुम्हाला भारताचं नागरिकत्व दिलं जाईल, असं आश्वासन त्यावेळी भारतातल्या नेत्यांनी पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना दिलं होतं,' असं शहा म्हणाले. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालMamata Banerjeeममता बॅनर्जी