शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

संध्याकाळी ६ नंतर ई-मेल, फोनचं टेन्शन विसरा; 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा रोजच 'दिवाळी-दसरा' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 16:16 IST

ऑफिसमधून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येईपर्यंत, म्हणजेच संध्याकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत तुम्ही कंपनीला उत्तरदायी नसाल, तो वेळ सर्वस्वी तुमचा असेल.

बेंगळुरूः

अब तो दिन,     रात पे हि आके रुकता है.मुझे याद है...पहले एक शाम भी हुआ करती थी.

व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेला हा शेर किंवा 'हाफ-डे'वाला सुपरहिट व्हिडीओ बहुधा अॅमेझॉन-इंडियाच्या प्रमुखापर्यंतही पोहोचला असावा आणि तो त्याच्या मनाला फारच भिडला असावा. कारण, संध्याकाळी ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ऑफिसच्या कुठल्याही ई-मेलला किंवा फोनला उत्तर दिलं नाही तरी चालेल, अशी दिलासादायक मुभा त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्याचं समजतं. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना 'टार्गेट'च्या मागे पळवत असताना, त्यांच्यावर अधिकाधिक वेळ आणि जास्तीत जास्त काम करण्यासाठी दबाव आणत असताना अॅमेझॉन इंडियानं हे पाऊल उचलल्यानं आश्चर्य आणि आनंद व्यक्त होतोय.

भारतातील अॅमेझॉनचे प्रमुख - कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांचा एक ई-मेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. 'शाम अपनी जिंदगी के नाम' करण्याची मंत्रच त्यांनी या ई-मेलद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. ऑफिसमधून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येईपर्यंत, म्हणजेच संध्याकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत तुम्ही कंपनीला उत्तरदायी नसाल, तो वेळ सर्वस्वी तुमचा असेल, या काळात कंपनीच्या ई-मेलला किंवा फोनला उत्तर देणं बंधनकारक नसेल, अशी सवलत त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलीय. ब्लूमबर्गच्या एका अहवालातही या ई-मेलचा उल्लेख आहे. हा मेल महिन्याच्या सुरुवातीला पाठवल्याचं बोललं जातंय. अर्थात, अॅमेझॉनतर्फे याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

कर्मचाऱ्यांना राबवून घेणारी कंपनी, अशीच काहीशी अॅमेझॉनची ओळख आहे. कंपनीचे संस्थापक-सीईओ जेफ बेजॉस हेही शिस्तीचे आणि कडक बॉस आहेत. अमित अग्रवाल हे त्यांचे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट होते. त्यामुळे त्यांनाही कामात कुठलीही हयगय चालत नाही. असं असतानाही, त्यांनी कर्मचाऱ्यांना एवढी मोठी खुशखबर दिल्यानं सगळेच अवाक झालेत. 

अॅमेझॉन भारताकडे मोठ्ठी बाजारपेठ म्हणून पाहतं. तब्बल ५.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचं नियोजन कंपनीने केलं आहे. त्यामुळे कामाचा व्याप किती मोठा असेल, याची आपण कल्पना करू शकतो. परंतु, कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण येऊ नये आणि त्यांनी कामाच्या वेळेत पूर्ण उत्साहाने काम करावं, यादृष्टीने कंपनीने त्यांची संध्याकाळ सुखाची केल्याचं बोललं जातंय. 

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण टार्गेटचं ओझं घेऊन वावरतोय. ना झोप पूर्ण होते, ना जेवणाच्या वेळा पाळल्या जातात. ही जीवनशैली वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक आजारांना आमंत्रण ठरतेय. त्याची योग्य वेळी दखल घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना थोडा अवधी देणं, उसंत देणं अत्यावश्यक आहे. सगळ्याच कंपन्यांनी तसा विचार करायला हवा. 

टॅग्स :amazonअॅमेझॉनEmployeeकर्मचारी