शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

संध्याकाळी ६ नंतर ई-मेल, फोनचं टेन्शन विसरा; 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा रोजच 'दिवाळी-दसरा' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 16:16 IST

ऑफिसमधून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येईपर्यंत, म्हणजेच संध्याकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत तुम्ही कंपनीला उत्तरदायी नसाल, तो वेळ सर्वस्वी तुमचा असेल.

बेंगळुरूः

अब तो दिन,     रात पे हि आके रुकता है.मुझे याद है...पहले एक शाम भी हुआ करती थी.

व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेला हा शेर किंवा 'हाफ-डे'वाला सुपरहिट व्हिडीओ बहुधा अॅमेझॉन-इंडियाच्या प्रमुखापर्यंतही पोहोचला असावा आणि तो त्याच्या मनाला फारच भिडला असावा. कारण, संध्याकाळी ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ऑफिसच्या कुठल्याही ई-मेलला किंवा फोनला उत्तर दिलं नाही तरी चालेल, अशी दिलासादायक मुभा त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्याचं समजतं. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना 'टार्गेट'च्या मागे पळवत असताना, त्यांच्यावर अधिकाधिक वेळ आणि जास्तीत जास्त काम करण्यासाठी दबाव आणत असताना अॅमेझॉन इंडियानं हे पाऊल उचलल्यानं आश्चर्य आणि आनंद व्यक्त होतोय.

भारतातील अॅमेझॉनचे प्रमुख - कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांचा एक ई-मेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. 'शाम अपनी जिंदगी के नाम' करण्याची मंत्रच त्यांनी या ई-मेलद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. ऑफिसमधून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येईपर्यंत, म्हणजेच संध्याकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत तुम्ही कंपनीला उत्तरदायी नसाल, तो वेळ सर्वस्वी तुमचा असेल, या काळात कंपनीच्या ई-मेलला किंवा फोनला उत्तर देणं बंधनकारक नसेल, अशी सवलत त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलीय. ब्लूमबर्गच्या एका अहवालातही या ई-मेलचा उल्लेख आहे. हा मेल महिन्याच्या सुरुवातीला पाठवल्याचं बोललं जातंय. अर्थात, अॅमेझॉनतर्फे याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

कर्मचाऱ्यांना राबवून घेणारी कंपनी, अशीच काहीशी अॅमेझॉनची ओळख आहे. कंपनीचे संस्थापक-सीईओ जेफ बेजॉस हेही शिस्तीचे आणि कडक बॉस आहेत. अमित अग्रवाल हे त्यांचे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट होते. त्यामुळे त्यांनाही कामात कुठलीही हयगय चालत नाही. असं असतानाही, त्यांनी कर्मचाऱ्यांना एवढी मोठी खुशखबर दिल्यानं सगळेच अवाक झालेत. 

अॅमेझॉन भारताकडे मोठ्ठी बाजारपेठ म्हणून पाहतं. तब्बल ५.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचं नियोजन कंपनीने केलं आहे. त्यामुळे कामाचा व्याप किती मोठा असेल, याची आपण कल्पना करू शकतो. परंतु, कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण येऊ नये आणि त्यांनी कामाच्या वेळेत पूर्ण उत्साहाने काम करावं, यादृष्टीने कंपनीने त्यांची संध्याकाळ सुखाची केल्याचं बोललं जातंय. 

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण टार्गेटचं ओझं घेऊन वावरतोय. ना झोप पूर्ण होते, ना जेवणाच्या वेळा पाळल्या जातात. ही जीवनशैली वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक आजारांना आमंत्रण ठरतेय. त्याची योग्य वेळी दखल घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना थोडा अवधी देणं, उसंत देणं अत्यावश्यक आहे. सगळ्याच कंपन्यांनी तसा विचार करायला हवा. 

टॅग्स :amazonअॅमेझॉनEmployeeकर्मचारी