शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

संध्याकाळी ६ नंतर ई-मेल, फोनचं टेन्शन विसरा; 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा रोजच 'दिवाळी-दसरा' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 16:16 IST

ऑफिसमधून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येईपर्यंत, म्हणजेच संध्याकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत तुम्ही कंपनीला उत्तरदायी नसाल, तो वेळ सर्वस्वी तुमचा असेल.

बेंगळुरूः

अब तो दिन,     रात पे हि आके रुकता है.मुझे याद है...पहले एक शाम भी हुआ करती थी.

व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेला हा शेर किंवा 'हाफ-डे'वाला सुपरहिट व्हिडीओ बहुधा अॅमेझॉन-इंडियाच्या प्रमुखापर्यंतही पोहोचला असावा आणि तो त्याच्या मनाला फारच भिडला असावा. कारण, संध्याकाळी ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ऑफिसच्या कुठल्याही ई-मेलला किंवा फोनला उत्तर दिलं नाही तरी चालेल, अशी दिलासादायक मुभा त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्याचं समजतं. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना 'टार्गेट'च्या मागे पळवत असताना, त्यांच्यावर अधिकाधिक वेळ आणि जास्तीत जास्त काम करण्यासाठी दबाव आणत असताना अॅमेझॉन इंडियानं हे पाऊल उचलल्यानं आश्चर्य आणि आनंद व्यक्त होतोय.

भारतातील अॅमेझॉनचे प्रमुख - कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांचा एक ई-मेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. 'शाम अपनी जिंदगी के नाम' करण्याची मंत्रच त्यांनी या ई-मेलद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. ऑफिसमधून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येईपर्यंत, म्हणजेच संध्याकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत तुम्ही कंपनीला उत्तरदायी नसाल, तो वेळ सर्वस्वी तुमचा असेल, या काळात कंपनीच्या ई-मेलला किंवा फोनला उत्तर देणं बंधनकारक नसेल, अशी सवलत त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलीय. ब्लूमबर्गच्या एका अहवालातही या ई-मेलचा उल्लेख आहे. हा मेल महिन्याच्या सुरुवातीला पाठवल्याचं बोललं जातंय. अर्थात, अॅमेझॉनतर्फे याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

कर्मचाऱ्यांना राबवून घेणारी कंपनी, अशीच काहीशी अॅमेझॉनची ओळख आहे. कंपनीचे संस्थापक-सीईओ जेफ बेजॉस हेही शिस्तीचे आणि कडक बॉस आहेत. अमित अग्रवाल हे त्यांचे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट होते. त्यामुळे त्यांनाही कामात कुठलीही हयगय चालत नाही. असं असतानाही, त्यांनी कर्मचाऱ्यांना एवढी मोठी खुशखबर दिल्यानं सगळेच अवाक झालेत. 

अॅमेझॉन भारताकडे मोठ्ठी बाजारपेठ म्हणून पाहतं. तब्बल ५.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचं नियोजन कंपनीने केलं आहे. त्यामुळे कामाचा व्याप किती मोठा असेल, याची आपण कल्पना करू शकतो. परंतु, कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण येऊ नये आणि त्यांनी कामाच्या वेळेत पूर्ण उत्साहाने काम करावं, यादृष्टीने कंपनीने त्यांची संध्याकाळ सुखाची केल्याचं बोललं जातंय. 

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण टार्गेटचं ओझं घेऊन वावरतोय. ना झोप पूर्ण होते, ना जेवणाच्या वेळा पाळल्या जातात. ही जीवनशैली वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक आजारांना आमंत्रण ठरतेय. त्याची योग्य वेळी दखल घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना थोडा अवधी देणं, उसंत देणं अत्यावश्यक आहे. सगळ्याच कंपन्यांनी तसा विचार करायला हवा. 

टॅग्स :amazonअॅमेझॉनEmployeeकर्मचारी