शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 10:45 IST

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अद्याप काही दिवस बाकी असले तरी विरोधी पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे.

लखनौ - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अद्याप काही दिवस बाकी असले तरी विरोधी पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 19 मे रोजी होणारे शेवटच्या फेरीतील मतदान आणि 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांनी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या बैठकीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती. दरम्यान, सर्व नेत्यांची उपस्थिती निश्चित झाल्यानंतर ही बैठक 21 मे रोजी आयोजित होणार आहे. चंद्राबाबू नायडू यांनी या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्याशीसुद्धा यादंर्भात चर्चा केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे.   दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मायावत आणि अखिलेश यादव यांनीही निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी विरोधकांनी बोलावलेल्या अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच या बैठकीबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते, असे समाजवादी पक्षाचे मत आहे. असे पक्षाच्या एका जेष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळेच दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत अखिलेश यादव सहभागी होणार नाहीत. 

  तर लोकसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाला किती जागा मिळतात, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत अशा बैठकीला काही अर्थ नसेल. असे बहुजन समाज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. एकीकडे चंद्राबाबू नायडू हे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे टीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी निकालांनंतर केंद्रात बिगर काँग्रेस बिगर भाजपा आघाडी बनवण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन तसेच डीएमकेचे नेते स्टॅलिन यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. 
 दरम्यान, चंद्रशेखर राव यांनी एम.के. स्टॅलिन यांच्यासोबत सोमवारी चर्चा केली होती. त्यावेळी केंद्रात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी स्टॅलिन यांची मदत मागितली. मात्र काँग्रेसला वगळून अशी आघाडी बनवणे व्यर्थ असल्याचे स्टॅलिन यांनी चंद्रशेखर राव यांना सांगितल्याचे वृत्त आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावतीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी