शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 10:45 IST

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अद्याप काही दिवस बाकी असले तरी विरोधी पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे.

लखनौ - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अद्याप काही दिवस बाकी असले तरी विरोधी पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 19 मे रोजी होणारे शेवटच्या फेरीतील मतदान आणि 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांनी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या बैठकीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती. दरम्यान, सर्व नेत्यांची उपस्थिती निश्चित झाल्यानंतर ही बैठक 21 मे रोजी आयोजित होणार आहे. चंद्राबाबू नायडू यांनी या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्याशीसुद्धा यादंर्भात चर्चा केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे.   दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मायावत आणि अखिलेश यादव यांनीही निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी विरोधकांनी बोलावलेल्या अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच या बैठकीबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते, असे समाजवादी पक्षाचे मत आहे. असे पक्षाच्या एका जेष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळेच दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत अखिलेश यादव सहभागी होणार नाहीत. 

  तर लोकसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाला किती जागा मिळतात, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत अशा बैठकीला काही अर्थ नसेल. असे बहुजन समाज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. एकीकडे चंद्राबाबू नायडू हे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे टीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी निकालांनंतर केंद्रात बिगर काँग्रेस बिगर भाजपा आघाडी बनवण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन तसेच डीएमकेचे नेते स्टॅलिन यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. 
 दरम्यान, चंद्रशेखर राव यांनी एम.के. स्टॅलिन यांच्यासोबत सोमवारी चर्चा केली होती. त्यावेळी केंद्रात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी स्टॅलिन यांची मदत मागितली. मात्र काँग्रेसला वगळून अशी आघाडी बनवणे व्यर्थ असल्याचे स्टॅलिन यांनी चंद्रशेखर राव यांना सांगितल्याचे वृत्त आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावतीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी