Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:53 IST2025-06-12T16:51:20+5:302025-06-12T16:53:29+5:30
Air India plane crash News: एअर इंडियाचे विमान गुजरातमध्ये कोसळले. अपघात झाला, त्यावेळी तब्बल २४२ जण होते. यात किती भारतीय आणि किती परदेशी, तसेच इतर माहिती समोर आली आहे.

Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
Air India Plane Crash Updates: दिल्लीवरून लंडनकडे जाणारे विमानअहमदाबादच्याविमानतळावर उतरले. त्यानंतर काही वेळातच ते तिथून लंडनच्या दिशेने झेपावले, पण काळाने झडप घातली आणि काही वेळात जळून खाक झाले. अनेक प्रवासी मरण पावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघात झाला तेव्हा विमानात १२ क्रू मेंबर्ससह २४२ जण होते. याबद्दलची अधिक माहिती आता समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, एअर इंडियाचे एआय१७१ बोईंग विमान अहमदाबाद विमानतळापासून १५ किमी अंतरावर कोसळले. विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण, विमानातील प्रवाशांबद्दल माहिती आली आहे.
विमानात कोणत्या देशाचे किती नागरिक?
लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या या विमानामध्ये १६९ भारतीय नागरिक होते. तर ५३ नागरिक ब्रिटनचे होते. प्रवासी १ कॅनडाचा होता. तर ७ पोर्तुगीजे नागरिक होते.
या विमानात स्त्री आणि पुरुष मिळून एकूण २१७ प्रौढ प्रवासी होते. तर ११ लहान मुले होते, तर दोन बालके होती.
एअर इंडिया विमान अपघात: प्रवाशांची संपूर्ण यादी
वसतिगृहावर कोसळले विमान
एअर इंडियाचे हे विमान मेघानीनगर भागात पडले. ज्या इमारतीवर हे विमान कोसळले, तिथे विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्य़ांचे वसतिगृह या इमारतीत असून, इमारतीचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातामुळे वसतिगृहातही जीवित हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Inside view of where the Air India flight crashed #Ai171#flightcrash#AirIndia#Mayday#VijayRupani#ahmedabadpic.twitter.com/ZlXKqWXzcd
— Alok Pandey (@alok_xr) June 12, 2025
अपघातग्रस्त झालेले विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादमध्ये आले होते. काही वेळानंतर ते लंडनकडे निघाले होते. बचाव व मदत कार्यासाठी तातडीने एनडीआरएफच्या जवानांच्या तीन तुकड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. ९० जवान गांधीनगरवरून अपघातस्थळी येत आहेत. त्याचबरोबर वडोदऱ्यावरूनही तीन तुकड्या पाठवल्यात आल्या आहेत.