शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:54 IST

Air India Plane Crash : एअर इंडियाच्या विमान अपघातावर चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालावर एअर इंडियाच्या सीईओ यांची प्रतिक्रिया आली आहे.

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल दिला आहे. या अहवालामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या अहवालावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी विमानात कोणतेही यांत्रिक बिघाड नव्हता, लगेच निष्कर्ष काढू नका, असं म्हटले आहे. 

सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आणि अपघाताबाबत घाईघाईने निष्कर्ष काढू नका असा सल्ला दिला.

पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

या अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून, डीजीसीएच्या देखरेखीखाली एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 विमानांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी काही दिवसांत पूर्ण झाली आणि सर्व विमाने उड्डाणासाठी पूर्णपणे योग्य असल्याचे आढळून आले, असंही सीईओंनी सांगितले. 

सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले, "आम्ही सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या आहेत आणि भविष्यात जर काही नवीन तपासण्या सुचवल्या गेल्या तर त्याही पूर्ण करू. यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना या अपघातावर घाईघाईने कोणतेही निष्कर्ष काढू नयेत असे आवाहन केले. तपास अजूनही सुरू आहे आणि संपूर्ण चित्र समोर येण्यासाठी वेळ लागेल, असंही त्यांनी सांगितले. 

एअर इंडिया तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी प्रत्येक पैलूची सखोल चौकशी केली जात आहे. एएआयबीचा अंतिम अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे, तो या अपघाताचे खरे कारण स्पष्ट करेल.

एअर इंडियाच्या सीईओ यांचे हे विधान फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नाही तर जनतेसाठी सुद्धा आहे. हा अपघात नेमका कसा घडला हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघात