शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:54 IST

Air India Plane Crash : एअर इंडियाच्या विमान अपघातावर चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालावर एअर इंडियाच्या सीईओ यांची प्रतिक्रिया आली आहे.

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल दिला आहे. या अहवालामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या अहवालावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी विमानात कोणतेही यांत्रिक बिघाड नव्हता, लगेच निष्कर्ष काढू नका, असं म्हटले आहे. 

सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आणि अपघाताबाबत घाईघाईने निष्कर्ष काढू नका असा सल्ला दिला.

पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

या अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून, डीजीसीएच्या देखरेखीखाली एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 विमानांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी काही दिवसांत पूर्ण झाली आणि सर्व विमाने उड्डाणासाठी पूर्णपणे योग्य असल्याचे आढळून आले, असंही सीईओंनी सांगितले. 

सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले, "आम्ही सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या आहेत आणि भविष्यात जर काही नवीन तपासण्या सुचवल्या गेल्या तर त्याही पूर्ण करू. यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना या अपघातावर घाईघाईने कोणतेही निष्कर्ष काढू नयेत असे आवाहन केले. तपास अजूनही सुरू आहे आणि संपूर्ण चित्र समोर येण्यासाठी वेळ लागेल, असंही त्यांनी सांगितले. 

एअर इंडिया तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी प्रत्येक पैलूची सखोल चौकशी केली जात आहे. एएआयबीचा अंतिम अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे, तो या अपघाताचे खरे कारण स्पष्ट करेल.

एअर इंडियाच्या सीईओ यांचे हे विधान फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नाही तर जनतेसाठी सुद्धा आहे. हा अपघात नेमका कसा घडला हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघात