Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 21:18 IST2025-06-12T21:16:58+5:302025-06-12T21:18:34+5:30
Air India plane crashes in Ahmedabad: एअर इंडियाच्या विमानाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. धावपट्टीच्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्यात विमान उड्डाणानंतर कसे कोसळले हे दिसत आहे.

Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
Air India plane crash Video : प्रवासी आणि क्रू मेंबर्स अशा २४२ जणांना घेऊन लंडनच्या दिशेने झेपावलेल्या एअर इंडियाचेविमानाचा भीषण अपघात झाला. गुरुवारी (१२ जून) दुपारी ही घटना घडली. अहमदाबाद विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले. विमान हवेत झेपावल्यानंतर काही मिनिटातच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या घटनेत लोकांचा तडफडून मृत्यू झाला. या अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एअर इंडियाचे AI171 हे विमान दिल्लीवरून आले होते आणि अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते.
विमानाने गुरुवारी (१२ जून) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. पण,त्यानंतर काही मिनिटांतच अहमदाबाद शहरातील मेघानीनगर भागात ते कोसळले. हे विमान कोसळले वैद्यकीय रुग्णालयाच्या वसतिगृहांच्या इमारतींवर!
वाचा >>अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले
ज्या भागात एअर इंडियाचे विमान कोसळले, ते मेघानीनगर विमानतळापासून १५ किमी दूर आहे. विमान कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
एअर इंडिया विमानाच्या अपघाताचा व्हिडीओ
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून हवेत झेपावते. त्यानंतर विशिष्ट उंचीपर्यंत वर जाते. पण, त्यानंतर विमान हळूहळू खाली येत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर अधूंक दिसायला लागते. त्यावेळी ते जमिनीवर कोसळते आणि मोठा स्फोट होतो.
Take off to Tragedy in 59 Seconds ! The CCTV footage here will be critical in finding out what caused the #planecrash . pic.twitter.com/6RnHVB7q5h
— Shreya Dhoundial (@shreyadhoundial) June 12, 2025
अपघातग्रस्त झालेले विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादमध्ये आले होते. काही वेळानंतर ते लंडनकडे निघाले होते.
मृतांच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत
या विमान अपघातात विमानातील २४० जण मरण पावले आहेत. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे.
या घटनेबद्दल टाटा समूहाने दुःख व्यक्त केले आहे. हे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, अशा शब्दात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
टाटा समूहाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर जे जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च टाटा समूह करणार आहे. विमान अपघातात वसतिगृहाचे मोठे नुकसान झाले आहे, त्याच्या उभारणीचा खर्चही टाटा समूह करणार आहे, असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.