शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लडाखमधील घुसखोरीनंतर आता पँगाँग सरोवराजवळ चिनी सैनिकांनी केले असे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 3:56 PM

भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमने-सामने आलेले आहे. तर एकमेकांना कुटनीतीच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी दोन्ही देशांचे सरकार प्रयत्नशील आहे.

ठळक मुद्देपँगाँग सरोवर परिसरात फिंगर ४ पर्यंत घुसलेल्या चिनी सैन्याने सरोवराच्या काठावर तळ ठोकला आहेतिथे चिनी सैन्याने एक मंदारीन प्रतीक चिन्ह आणि चीनचा नकाशा तयार केला आहेचिनी सैन्याने हे कोरीवकाम फिंगर ४ आणि फिंगर ५ दरम्यान केले आहे.  याची लांबी तब्बल ८१ मीटर आणि रुंदी सुमारे २५ मीटर आहे.

लेह (लडाख) - लडाखमध्ये चिनी सैनिकांकडून सातत्याने चाललेला घुसखोरीचा प्रयत्न आणि गलवान खोऱ्यात चिनी सैनिकाशी झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमने-सामने आलेले आहे. तर एकमेकांना कुटनीतीच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी दोन्ही देशांचे सरकार प्रयत्नशील आहे. मात्र असे असले तरी नियंत्रण रेषेवर असलेल्या चिनी सैन्याकडून रोज नव्या उचापती सुरू आहेत.

पँगाँग सरोवर परिसरात फिंगर ४ पर्यंत घुसलेल्या चिनी सैन्याने सरोवराच्या काठावर तळ ठोकला असून, तिथे चिनी सैन्याने एक मंदारीन प्रतीक चिन्ह आणि चीनचा नकाशा तयार केला आहे. चिनी सैन्याने हे कोरीवकाम फिंगर ४ आणि फिंगर ५ दरम्यान केले आहे.  याची लांबी तब्बल ८१ मीटर आणि रुंदी सुमारे २५ मीटर आहे. तसेच ही चिन्हे एवढी मोठी आहेत की, ती सॅटेलाइट फोटोमध्येही स्पष्टपणे दिसून येत आहेत. दरम्यान, तिबेटमध्ये असलेले चिनी सैन्याचे ओव्हरऑल कमांडर वँग हायजँग यांचा एक फोटो नुकताच समोर आला होता. त्या ते भारत आणि चीनच्या सीमेवर लिहिलेले चीनचे नाव रंगवताना दिसत होते.  

लडाखमधील पँगाँग सरोवरामधून भारत आणि चीनची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जाते. या सरोवराला लागून असलेल्या फिंगर १ ते ८ पर्यंत आपला हक्क आहे असा भारताचा दावा आहे. तर चीन हल्ली फिंगर आठ ते चार पर्यंत आपला दावा सांगू लागला आहे. तसेच सध्या फिंगर ४ जवळ दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आलेले आहे. येथेच मे महिन्यामध्ये चिनी सैन्य आणि भारताच्या जवानांमध्ये झटापटी झाल्या होत्या. त्यावेळी चिनी सैनिकांनी काटेरी तारा गुंडाळलेले रॉड आणि सळ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता.  

सध्या फिंगर ४ पर्यंत चिनी सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात असून, त्यांच्याकडून भारतीय जवानांना फिंगर आठपर्यंत गस्त घालण्यापासून रोखण्यात येत आहे. तसेच या भागात चिनी सैन्याकडून मोठ्या प्रमाणावर स्थायी आणि अस्थायी बांधकाम झाल्याचे छायाचित्रांमधून दिसत आहे.  

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीन