शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 15:12 IST

Rahul Gandhi News: विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच गुजरातच्या दौऱ्यावर गेले आहेत. येथे राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांच्या असलेल्या अनुपस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. भाजपाला बहुमतापासून दूर ठेवल्याने सध्या राहुल गांधी आणि काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच गुजरातच्या दौऱ्यावर गेले आहेत. येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी यांच्या असलेल्या अनुपस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी दिसले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना रथयात्रेच्या रथावर पाहिले होते. मोदींनी त्यांना मदत केली होती, असं म्हणतात. मी संसदेत विचार करत होतो की, राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये अदानी-अंबानी दिसले, मात्र गरीब दिसले नाहीत. भाजपाचं राजकारण हे अयोध्येवर केंद्रित झालेलं होतं.  त्यांनी भगवान रामाला राजकारणाचा मुद्दा बनवलं, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, मी अयोध्येच्या खासदारांना विचारलं की, राम मंदिर उभारलं असतानाही इंडिया आघाडी अयोध्येत कशी काय जिंकली? त्यावर त्यांनी मला सांगितलं की, मला माहिती होतं की, मी अयोध्येतून लढणार आणि जिंकणार. राम मंदिरापासून भाजपानं आपलं राजकारण सुरू केलं आणि अयोध्येमध्येत पराभूत झाले. निवडणुकीपूर्वी भाजपानं रामाच्या नावाने राजकारणाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केल आणि अयोध्येतच त्यांचा पराभव झाला, असा टोला त्यांनी लगावला.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujaratगुजरात